Team India won
अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका भारतीय संघाने ३-१ ने जिंकली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिमयवर झालेल्या चौथ्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. भारतीय संघाने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला. वाशिंग्टन सुंदरचे शतक फक्त चार धावांनी हुकले. त्याने १७४ चेंडूत १० चौकार आणि १ षटकारासह नाबाद ९६ धावा केल्या.
भारताने पहिल्या डावात १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवात खराब झाली. अश्विनने क्रॉली आणि जॉनी बेयरस्टोला बाद करत २ बाद १० अशी इंग्लंडची अवस्था केली. त्यानंतर अक्षर पटेलने डॉमनिक सिबलीला माघारी पाठवले. अश्विनने बेन स्टोक्सला शून्यावर बाद केले. पाचव्या विकेटसाठी जो रूट आणि ओली पोप यांनी ३५ धावांची भागीदारी केली. पोपला अक्षरने १५ धावांवर बाद केले. त्यानंतर अश्विनने कर्णधार जो रूटला (३०) बाद केले. त्यानंतर सातव्या विकेटसाठी बेन फोक्स आणि लॉरेंन्स यांनी ४३ धावांची भागीदारी केली. अक्षरने फोक्सला माघारी पाठवले, अजिंक्य रहाणेने त्याचा शानदार कॅच घेतला. अक्षरने डोमिनिक बेसला बाद करत इंग्लंडची आठवी विकेट घेतली. अश्विनने जॅक लीचला बाद करत इंग्लंडची नववी विकेट घेतली. दुसऱ्या डावात आर अश्विन आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी पाच विकेट घेतल्या.
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ ने जिंकत भारतीय संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जूनमध्ये लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघ समोरासमोर असतील.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…
मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…