Mumbai Indians won the toss and elected to bat
आबुधाबी: आज राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामातही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला आहे. रोहित शर्मविना खेळतानाही मुंबईने चेन्नईसारख्या संघावर दणदणीत विजय मिळवला होता. काही सामन्यांचा अपवाद वगळता संघातील सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत असल्यामुळे आतापर्यंत या संघात फारसे बदल झालेले दिसले नाहीत.
चेन्नईविरुद्ध सामन्यात कर्णधार रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे कायरन पोलार्डने संघाचं नेतृत्व केलं. प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ अवघी काही पावलं दूर आहे. त्यामुळे राजस्थाविरुद्ध सामन्यात विजय मिळवत आपलं अव्वल स्थान कायम राखण्याकडे मुंबईचा कल असणार आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यातही कायरन पोलार्डच मुंबईचं नेतृत्व करणार आहे.
राजस्थान रॉयल्सपेक्षा मुंबई इंडियन्सचेच पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही सामन्यांतील निराशाजनक कामगिरीमुळे राजस्थानचा संघ सध्या गुणतालिकेत तळातल्या स्थानावर फेकला गेला आहे. या संघाचं स्पर्धेतलं आव्हान जवळपास संपुष्टात आलेलं असून यापुढील सामन्यांमध्ये एखादी चमत्कारीक खेळी राजस्थानला वाचवू शकते. अबुधाबीच्या मैदानावर मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्जने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यात मुंबईने संघात एक बदल केला असून कुल्टर-नाईलच्या जागेवर जेम्स पॅटिन्सन संघात परत आला आहे.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…