Ind vs Aus 3rd ODI: Team India gives Australia 303 runs target
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 303 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 302 धावा केल्या. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने नाबाद 92 धावा केल्या. या खेळीत पांड्याने 1 सिक्स तर 7 चौकार लगावले. रवींद्र जडेजाने 50 चेंडूत 5 फोर आणि 3 सिक्ससह नाबाद 66 धावा केल्या. जडेजा आणि हार्दिक या जोडीने सहाव्या विकेटसाठी नाबाद 154 धावांची भागीदारी केली.
मयांक अग्रवालच्या अनुपस्थितीत युवा शुभमन गिल शिखर धवनच्या सोबतीला सलामीसाठी आला. आश्वासक सुरुवात केल्यानंतर शिखर धवन शेन अबॉटच्या गोलंदाजीवर सोपा झेल देऊन माघारी परतला. यानंतर कर्णधार विराटने शुभमन गिलच्या साथीने महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. शुभमन ने यादरम्यान काही फटके खेळले. फिरकीपटू अॅगरने शुभमनला माघारी धाडत भारताला मोठा धक्का दिला. यानंतर श्रेयस अय्यर आणि लोकेश राहुलही फारशी चमक न दाखवता माघारी परतले. कर्णधार विराट कोहलीने 5 चौकारांच्या मदतीने 78 चेंडूत 63 धावांची झुंजार खेळी केली. यामध्ये विराटने 5 चौकार लगावले. ऑस्ट्रेलियाकडून अॅश्टन अॅगरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. अॅडम झॅम्पा, जोश हेझलवुड आणि सीन एबोट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…