IND vs ENG : Another blow to the Indian team after the defeat
IND vs ENG : भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात पाराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक झटका बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारतीय संघ आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान होता. पण या पराभवानंतर भारतीय संघाने अव्वल स्थान गमावले असून थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.
इंग्लंडने भारतावर विजय मिळवत या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. इंग्लंडची आता ७०.२ अशी विजयाची टक्केवारी झाली आहे आणि त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. या क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर, तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर आला आहे. तर भारतीय संघाची अव्वल स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.
चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा २२७ धावांनी पराभव झाला. अखेरच्या दिवशी भारताचा दुसरा डाव फक्त १९७ धावात संपुष्ठात आला. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना १३ फेब्रुवारीपासून सूरू होणार आहे.
आज खेळाला सुरुवात झाली तेव्हा भारतीय संघाला ३८१ तर इंग्लंडला ९ विकेटची गरज होती. काल रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी पाचव्या दिवशी डावाची सुरूवात केली. जॅक लीचने पुजाराला १६ धावांवर बाद करून दुसरा धक्का दिला. त्यानंतर गिलने सलग तिसऱ्या कसोटीत अर्धशतक पूर्ण केले. गिल बाद झाल्यावर विराट आणि अश्विन या दोघांनी १७१ धावसंख्येपर्यंत संघाला नेले. लीचने अश्विनला बाद केले आणि भारताला सातवा धक्का दिला. त्यानंतर विराटने कसोटीतील २४वे अर्धशतक झळकावले. विराट आणि नदीम किती वेळ मैदानावर थांबतात याची उत्सुकता होती. पण स्टोक्सने विराटला त्रिफळाचित केले. त्यानंतर नदीमला लीचने तर जोफ्रा आर्चरने बुमराहला बाद करत विजय मिळवला.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारतीय संघाला तब्बल २२ वर्षांनंतर पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या २२ वर्षात भारतीय संघाला चेन्नईमध्ये कसोटी सामन्यात एकही पराभव पत्करावा लागला नव्हता. भारताला यापूर्वी चेन्नईमध्ये १९९९ साली पराभव पत्करावा लागला होता. पण आज झालेल्या पराभवानंतर भारताची ही विजयी मालिका खंडीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…