राजकारण

धनंजय मुंडे-धस भेटीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सुरेश धस यांच्या पाठिशी ठाम समर्थन, संजय राऊत यांच्यावर टीका: मुर्खांना मी उत्तर देत नाही

राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस यांच्या भेटीवर चर्चा रंगली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणारे आमदार सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे विरोधकांच्या लक्ष्यावर आले आहेत. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावातून प्रतिक्रिया देत विरोधकांना टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, “संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी, यासाठीच आमदार सुरेश धस काम करत आहेत. या प्रकरणात ते पुढाकार घेत आहेत आणि यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला.

राजकारणावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोण कुणाला भेटले यावर राजकारण होत असेल, तर ते लोकशाहीत योग्य नाही. लोकशाहीत संवाद कायम राहावा लागतो. सुरेश धस यांनी या प्रकरणात गंभीर भूमिका घेतली आहे. त्याच्याद्वारे संवाद तोडण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही. धनंजय मुंडे हे राज्याचे मंत्री आहेत, त्यामुळे एक आमदार आणि एक मंत्री यांची भेट होणे सामान्य आहे.

खासदार संजय राऊत यांच्यावर फडणवीस यांची टीका
खासदार संजय राऊत यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी एक वाक्यात उत्तर दिले. ते म्हणाले, मुर्खांना मी उत्तर देत नाही. हे माहीत असूनही तुम्ही हा प्रश्न विचारत आहात?

अमृता फडणवीस यांचे गाणे आणि समाजातील प्रतिसाद
अमृता फडणवीस यांच्या गाण्याबद्दल बोलताना, फडणवीस म्हणाले, संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर हे गाणे रिलीज झाले आहे. हे गाणे फक्त बंजारांच नाही, तर सर्व समाजाला आवडले आहे. हे गाणे आपल्या गुरूंच्या प्रती, संतांच्या प्रती एक आराधना आहे.

शाळांमध्ये मराठी शिकवण्याबाबत फडणवीस यांचे मत
मुंबईत मराठी शाळांची टक्केवारी घसरल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, कुठल्याही मराठी शाळा बंद होणार नाहीत, हे आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे. शाळा इंग्रजी असो किंवा हिंदी, त्यांना मराठी शिकवावे लागेल. आम्ही त्याची सक्ती केली आहे आणि त्याचे पालन होईल, याकडे आमचे लक्ष आहे.

नाशिक आणि रायगड पालकमंत्री वादावर फडणवीस यांचे म्हणणे
नाशिक आणि रायगड पालकमंत्र्यांमधील वाद लवकरच मिटतील, असे फडणवीस यांनी म्हटले.

जळगाव येथील पोलीस कर्मचाऱ्याच्या अपहरण आणि हल्ल्याबाबत फडणवीस यांची प्रतिक्रिया
जळगाव येथील चोपडा येथील पोलीस कर्मचाऱ्याच्या अपहरण आणि हल्ल्याच्या घटनेवर फडणवीस म्हणाले, मध्यप्रदेश पोलिसांना आम्ही सांगितले आहे की, त्यांच्या राज्यात होणाऱ्या बेकायदेशीर कारवायांना रोखण्यासाठी पावले उचलावीत. दोन्ही राज्यांमधील पोलीस दलात समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

9 तास ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

2 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago