देश

लखीमपूर खेरी हिंसा : अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक

लखीमपूर : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अखेर १२ तासांच्या चौकशीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा याच्यावर गंभीर आरोप आहेत. सर्वोच्च् न्यायालयाने दाखल घेतल्यानंतर याप्रकरणी तपासाला वेग आला. उत्तर प्रदेश पोलिसांकडून काल सकाळी ११ वाजल्यापासून मिश्रा याची चौकशी करण्यात येत होती. मात्र, चौकशीत सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी आशिष मिश्रा याला अटक केली आहे.

‘आरोपीची चौकशी करण्यात आली, परंतु, त्यात आरोपी सहकार्य करायला तयार नाही. पोलिसांच्या काही प्रश्नांना आरोपी प्रतिसाद देत नसल्याने व दाखल गुन्हा गंभीर असल्याने अटक करण्यात आली आहे’, असे लखीमपूर खेरी प्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक उपेंद्र अग्रवाल यांनी सांगितले. आशिष याला उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

लखीमपूर खेरीतील घटना :

लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांना जीपखाली चिरडण्यात आले होते. ही जीप केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा चालवत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आणखी चार जणांचा बळी गेला होता. दरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्रा हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम १४७, १४८, १४९ (दंगलीशी संबंधित कलमे), २७९ (बेदरकारपणे गाडी चालवणे), ३३८ (जीवाला धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीने एखाद्याला इजा करणे), ३०४ अ, ३०२ (हत्या), आणि १२० ब ( गुन्हेगारी कट रचणे ) अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

3 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

3 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

3 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

3 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 महिना ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 महिना ago