देश

ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालाच नाही, निवडणूक आयोगाचा निर्णय

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला झालेल्या दुखापतीबद्दलच्या अहवालानंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबतीत अनेक वेगवेगळ्या अहवालांच्या आधारे निवडणूक आयोग या निष्कर्षापर्यंत पोहोचला आहे की ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालेला नाही, त्याबाबत कोणताही पुरावा मिळालेला नाही. म्हणजेच नंदीग्राममध्ये ममता यांच्या पायाला झालेली जखम हा एक अपघात होता.

ममता बॅनर्जी जखमी झाल्यानंतर निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय, विशेष पोलिस पर्यवेक्षक विवेक दुबे आणि विशेष पर्यवेक्षक अजय नायक यांनी तयार केलेल्या अहवालावरून हा निर्णय घेण्यात आहे. शनिवारी सायंकाळी या घटनेचा सविस्तर अहवाल आयोगाला सादर करण्यात आला. काही तासांपूर्वी विशेष पोलिस पर्यवेक्षक आणि विशेष पर्यवेक्षक यांचे अहवालही आयोगाला मिळाले. त्यानंतर आज दुपारी बैठक बोलावून या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर निवडणूक आयोगाने सांगितले की ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचा पुरावा मिळालेला नाही.

बंगालचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांनी आपला नवीन चौकशी अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला होता कारण त्यांच्या पहिल्या अहवालात घटनेमागील खरे कारण काय होते हे समजू शकले नाही. ही घटना कोठे व कशी घडली हे या पहिल्या अहवालावरून कळू शकले नाही. मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात गर्दीचा दबाव, अरुंद रस्ता, रस्त्याच्या कडेला असलेला लोखंडी खांब, दरवाजा धक्का लागून बंद झाला, ममता यांचा बाहेर असलेला पाय जखमी झाला, यासारख्या वस्तुस्थितीनुसार गोष्टी नमूद केल्या होत्या, परंतु, हा अहवाल एका निर्णयापर्यंत पोहोचला नव्हता.

त्यानंतर मात्र वेगवेगळ्या अहवालांवर विचारमंथन केल्यानंतर निवडणूक आयोगाने असा निष्कर्ष काढला आहे की ममता बॅनर्जी यांना झालेली जखम ही हल्ल्यामुळे झाली नव्हती. तर तो एक अपघात होता. मात्र, ममता बॅनर्जी यांनी षडयंत्रांतर्गत त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा

अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…

2 दिवस ago

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

2 आठवडे ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

2 आठवडे ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

2 आठवडे ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

2 आठवडे ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

2 आठवडे ago