Mamata Banerjee was not attacked, Election Commission decision
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पायाला झालेल्या दुखापतीबद्दलच्या अहवालानंतर आता चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबतीत अनेक वेगवेगळ्या अहवालांच्या आधारे निवडणूक आयोग या निष्कर्षापर्यंत पोहोचला आहे की ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झालेला नाही, त्याबाबत कोणताही पुरावा मिळालेला नाही. म्हणजेच नंदीग्राममध्ये ममता यांच्या पायाला झालेली जखम हा एक अपघात होता.
ममता बॅनर्जी जखमी झाल्यानंतर निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय, विशेष पोलिस पर्यवेक्षक विवेक दुबे आणि विशेष पर्यवेक्षक अजय नायक यांनी तयार केलेल्या अहवालावरून हा निर्णय घेण्यात आहे. शनिवारी सायंकाळी या घटनेचा सविस्तर अहवाल आयोगाला सादर करण्यात आला. काही तासांपूर्वी विशेष पोलिस पर्यवेक्षक आणि विशेष पर्यवेक्षक यांचे अहवालही आयोगाला मिळाले. त्यानंतर आज दुपारी बैठक बोलावून या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर निवडणूक आयोगाने सांगितले की ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याचा पुरावा मिळालेला नाही.
बंगालचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांनी आपला नवीन चौकशी अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला होता कारण त्यांच्या पहिल्या अहवालात घटनेमागील खरे कारण काय होते हे समजू शकले नाही. ही घटना कोठे व कशी घडली हे या पहिल्या अहवालावरून कळू शकले नाही. मुख्य सचिवांनी आपल्या अहवालात गर्दीचा दबाव, अरुंद रस्ता, रस्त्याच्या कडेला असलेला लोखंडी खांब, दरवाजा धक्का लागून बंद झाला, ममता यांचा बाहेर असलेला पाय जखमी झाला, यासारख्या वस्तुस्थितीनुसार गोष्टी नमूद केल्या होत्या, परंतु, हा अहवाल एका निर्णयापर्यंत पोहोचला नव्हता.
त्यानंतर मात्र वेगवेगळ्या अहवालांवर विचारमंथन केल्यानंतर निवडणूक आयोगाने असा निष्कर्ष काढला आहे की ममता बॅनर्जी यांना झालेली जखम ही हल्ल्यामुळे झाली नव्हती. तर तो एक अपघात होता. मात्र, ममता बॅनर्जी यांनी षडयंत्रांतर्गत त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप केला होता.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…