Appreciation of India from WHO
कोरोना संकटात भारत अनेक देशांच्या मदतीला धावला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश असूनही भारताने मित्रत्वाच्या नात्याने अनेक देशांना मदत केली आहे. भारताने कोरोना काळात सुरुवातीला मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, कोरोना टेस्ट किट तसेच हायड्रॉक्सीक्लोरीक्विन, रेमडेसिवीर, पॅरासिटामॉल ही औषधे अशा स्वरुपात मदत केली. आता भारत लसीचा पुरवठा करत आहे. जगातील अनेक देशांना वॅक्सिन पुरवण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच शेजारी देशांनाही भारताकडून मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनचा पुरवठा झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याची दखल घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेबरेयेसस यांनी भारताचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे कोरोनाशी सुरू असलेल्या मुकाबल्यात आपली स्थिती हळू हळू बळकट होत आहे. त्यांनी मदतीसाठी मोदींचे आभार प्रकट केले. एकत्र येऊन ज्ञानाची देवाणघेवाण केली तरच कोरोना संकटाचा मुकाबला करुन जास्तीत जास्त प्राण वाचवता येतील, असेही टेड्रोस घेबरेयेसस म्हणाले.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…