Appreciation of India from WHO
कोरोना संकटात भारत अनेक देशांच्या मदतीला धावला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश असूनही भारताने मित्रत्वाच्या नात्याने अनेक देशांना मदत केली आहे. भारताने कोरोना काळात सुरुवातीला मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, कोरोना टेस्ट किट तसेच हायड्रॉक्सीक्लोरीक्विन, रेमडेसिवीर, पॅरासिटामॉल ही औषधे अशा स्वरुपात मदत केली. आता भारत लसीचा पुरवठा करत आहे. जगातील अनेक देशांना वॅक्सिन पुरवण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच शेजारी देशांनाही भारताकडून मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनचा पुरवठा झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याची दखल घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेबरेयेसस यांनी भारताचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे कोरोनाशी सुरू असलेल्या मुकाबल्यात आपली स्थिती हळू हळू बळकट होत आहे. त्यांनी मदतीसाठी मोदींचे आभार प्रकट केले. एकत्र येऊन ज्ञानाची देवाणघेवाण केली तरच कोरोना संकटाचा मुकाबला करुन जास्तीत जास्त प्राण वाचवता येतील, असेही टेड्रोस घेबरेयेसस म्हणाले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…