कोरोना संकटात भारत अनेक देशांच्या मदतीला धावला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने जगात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश असूनही भारताने मित्रत्वाच्या नात्याने अनेक देशांना मदत केली आहे. भारताने कोरोना काळात सुरुवातीला मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर, ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, कोरोना टेस्ट किट तसेच हायड्रॉक्सीक्लोरीक्विन, रेमडेसिवीर, पॅरासिटामॉल ही औषधे अशा स्वरुपात मदत केली. आता भारत लसीचा पुरवठा करत आहे. जगातील अनेक देशांना वॅक्सिन पुरवण्याचे नियोजन सुरू आहे. तसेच शेजारी देशांनाही भारताकडून मोठ्या प्रमाणावर वॅक्सिनचा पुरवठा झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याची दखल घेतली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेबरेयेसस यांनी भारताचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे कोरोनाशी सुरू असलेल्या मुकाबल्यात आपली स्थिती हळू हळू बळकट होत आहे. त्यांनी मदतीसाठी मोदींचे आभार प्रकट केले. एकत्र येऊन ज्ञानाची देवाणघेवाण केली तरच कोरोना संकटाचा मुकाबला करुन जास्तीत जास्त प्राण वाचवता येतील, असेही टेड्रोस घेबरेयेसस म्हणाले.
नवी दिल्ली : केंद्रसरकार प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करत असते. त्यास अनुसरून यावर्षीही पद्म…
मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून…
ठाणे : ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश आलं आहे. ठाण्याची जागा शिवसेनाच…
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित 'मतासाठी निधी' या…
मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले…
मुंबई, दि. 24 : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि…