मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील पार्टवारा रोडवरील झाल्लार गावात रात्री दोन वाजेच्या सुमारास बस आणि तवेरा कारची धडक होऊन जीपमधील 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 पुरुष, 4 महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बैतुलचे पोलीस अधीक्षक सिमला प्रसाद यांनी सांगितले की, रिकाम्या जाणाऱ्या एमपी 48 पी 0193 या बसची आणि तवेरा कारची धडक झाली. कारमधील सर्व लोक मजूर आहेत जे महाराष्ट्रातील कळंबा येथून आपल्या गावी परतत होते. कारचे काही भाग कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. याशिवाय बसच्या पुढील भागाचेही नुकसान झाले आहे. या अपघातात बसचालक यशवंत पार्टे जखमी झाला. माहिती मिळताच बैतुलचे जिल्हाधिकारी आणि एसपीसह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
कामगार 20 दिवसांनी घरी परतत होते
बैतूल जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 35 किमी अंतरावर असलेल्या परतवारा मार्गावरील झाल्लार गावात बस आणि तवेरा यांच्यात झालेल्या धडकेत प्राण गमावलेले 11 जण सुमारे 20 दिवसांनी आपापल्या घरी परतत होते. महाराष्ट्रात मजूर म्हणून काम करून परतत असताना एका अपघाताने त्यांचा जीव घेतला. ते ज्या तवेरामध्ये परतत होते, त्या तवेराच्या चालकाला अचानक डुलकी लागल्यामुळे तवेराचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात ती बसवर धडकली. जिल्हाधिकारी अमनबीर सिंह बैंस यांनी सांगितले की, बस आणि जीपच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मेंढा, चिखलर आणि महातगाव येथील सहा पुरुष, तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.
या अपघातातील मृतांची नावे
अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…