11 People Died In A Bus Accident Which Collided With A Car
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील पार्टवारा रोडवरील झाल्लार गावात रात्री दोन वाजेच्या सुमारास बस आणि तवेरा कारची धडक होऊन जीपमधील 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 पुरुष, 4 महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बैतुलचे पोलीस अधीक्षक सिमला प्रसाद यांनी सांगितले की, रिकाम्या जाणाऱ्या एमपी 48 पी 0193 या बसची आणि तवेरा कारची धडक झाली. कारमधील सर्व लोक मजूर आहेत जे महाराष्ट्रातील कळंबा येथून आपल्या गावी परतत होते. कारचे काही भाग कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. याशिवाय बसच्या पुढील भागाचेही नुकसान झाले आहे. या अपघातात बसचालक यशवंत पार्टे जखमी झाला. माहिती मिळताच बैतुलचे जिल्हाधिकारी आणि एसपीसह अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
कामगार 20 दिवसांनी घरी परतत होते
बैतूल जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 35 किमी अंतरावर असलेल्या परतवारा मार्गावरील झाल्लार गावात बस आणि तवेरा यांच्यात झालेल्या धडकेत प्राण गमावलेले 11 जण सुमारे 20 दिवसांनी आपापल्या घरी परतत होते. महाराष्ट्रात मजूर म्हणून काम करून परतत असताना एका अपघाताने त्यांचा जीव घेतला. ते ज्या तवेरामध्ये परतत होते, त्या तवेराच्या चालकाला अचानक डुलकी लागल्यामुळे तवेराचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात ती बसवर धडकली. जिल्हाधिकारी अमनबीर सिंह बैंस यांनी सांगितले की, बस आणि जीपच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मेंढा, चिखलर आणि महातगाव येथील सहा पुरुष, तीन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.
या अपघातातील मृतांची नावे
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…