महाराष्ट्र

पावसाळी अधिवेशन : विरोधकांचा सभात्याग, विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

मुंबई : मुंबईत विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून (17 जुलै) सुरू झाले. मात्र, विरोधकांनी कामकाज सुरू होताच थोड्या वेळाने सभात्याग केला. नंतर विरोधक कामकाज संपेपर्यंत सभागृहात परतले नाही. त्यानंतर पहिल्या दिवसाचे कामकाज अवघ्या काही तासांतच संपले.

दरम्यान, अधिवेशन सुरू होण्याअगोदर विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘सासूमुळे वाटणी झाली आणि सासू वाट्याला आली’, ’50 खोके, एकदम ओके…’, ‘घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार’ अशा शब्दात सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीका केली. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यासाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट आले होते. पण शरद पवार यांना समर्थन देणाऱ्या आमदारांपैकी एकहीजण तिथे उपस्थित नव्हता.

विरोधकांनी सभात्याग केला
कामकाज सुरू झाल्यानंतर अधिवेशनात शेतकऱ्यांचा मुद्दा मांडण्यात आला. पुरेसा पाऊस पडलेला नाही, पेरण्या अपुऱ्या आहेत पण सरकारने शेतकऱ्यांकडे लक्षच दिलेले नाही, अशा स्वरुपाचा आरोप काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी केला. या आरोपाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह उत्तर दिले. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आल्यास सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील. बोगस बियाणा संदर्भात कडक कारवाई करू. सकारकडून शेतकऱ्यांना 10 हजार कोटीचीं मदत देण्यात आली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या उत्तरानंतरही विरोधकांनी सरकारवर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कायम ठेवला. यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध करत असल्याचे सांगत विरोधकांनी सभात्याग केला.

विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
संसद आणि विधिमंडळातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचे आकस्मिक निधन, चाहत्यांमध्ये शोककळा

मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…

6 दिवस ago

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…

7 दिवस ago

तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…

7 दिवस ago

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

1 आठवडा ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

1 आठवडा ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

1 महिना ago