The central government should give at least 3 crore doses of vaccine to Maharashtra every month says Rajesh Tope
मुंबई : केंद्र सरकारने राज्याला दर महिन्याला लसीचे किमान ३ कोटी डोस उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करणारा ठराव आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत मांडला. त्याची कारणे देखील त्यांनी सांगितली. यावेळी कोरोना परिस्थितीची माहिती देतानाच उपनगरीय लोकल ट्रेन सुरू करण्याबाबतही त्यांनी महत्त्वाचं विधान केलं. ते म्हणाले की लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं तर लोकल सुरू करता येईल.
राजेश टोपे म्हणाले कि, “कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग महाराष्ट्रात झाल्याचं आपल्याला आकडेवारीवरून दिसतं. तसेच डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. म्युकर मायकोसिसचे देखील ५ हजार रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात सामूहिक प्रतिकार शक्ती निर्माण करायची असेल तर राज्यातील जनतेचं लसीकरण मोठ्या संख्येने होणं आवश्यक आहे.”
टोपे यांनी स्पष्ट केलं कि, “कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात निर्बंध लावले आहेत. मुंबईसारख्या शहरात लोकल बंद असल्यामुळे सव्वा कोटीचं शहर असलेल्या मुंबईत अनेक अडचणी येत आहेत. लोकांना कामाच्या ठिकाणी पोहोचणं अशक्य झालं आहे. त्यामुळे लोकल सुरू करण्याची मागणी अनेक घटकांकडून होत आहे, मात्र लसीकरण मोठ्या प्रमाणात झालं, तरच लोकल सुरू करता येईल.”
‘राज्याच्या आरोग्य विभागाची दिवसाला १० लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. सार्वत्रिक लसीकरण आपल्याला दोन महिन्यांत पूर्ण करावं लागणार आहे. सध्या आपण १८ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लस देत आहोत. पण ५ वर्षांहून अधिक वय असलेल्या मुलांना लस द्यायचं ठरविल्यास आपल्याला लशींचे अधिक डोस लागणार आहेत. तरच आपण सार्वजनिक प्रतिकारक्षमता निर्माण करू शकतो. त्यासाठीच केंद्राने राज्याला महिन्याला ३ कोटी डोस द्यावेत, अशी मागणी करावी लागणार असल्याचं ते म्हणाले.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…