double murder
ठाणे : ठाण्यातील भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी परिसरात एका वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली असून, हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जगन्नाथ पाटील (८३) आणि सत्यभामा जगन्नाथ पाटील (७५) अशी हत्या झालेल्या वृद्ध व्यक्तींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र वज्रेश्वरी येथील अकलोली परिसरातील पेंढारपाडा येथे हे वृद्ध पती-पत्नी राहत होते. शुक्रवारी मध्यरात्री त्या दोघांचीही धारदार शस्त्राने गळा कापून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्यामुळे शेजाऱ्यांनी आत जाऊन बघितले असता त्यांना धक्का बसला. दोघे वृद्ध पती-पत्नी घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. वृद्ध महिलेच्या अंगावरील दागिने तसेच होते. चोरीच्या उद्देशाने दरोडेखोर किंवा चोरट्यांनी ही हत्या केली नसून, ओळखीच्या व्यक्तीनेच हे कृत्य केले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र या दाम्पत्याची हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…