Thackeray government's Rs 12,000 crore scam, proposal postponed for now after objections - Kirit Somaiya
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे कि कोविड काळात 5000 बेड्सचं रुग्णालय उभं करण्याच्या नावाखाली स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर हा घोटाळा झाला आहे. किरीट सोमय्या यांचा दावा आहे की उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून महानगरपालिका आयुक्तांनी 72 तासांच्या आत एका खाजगी बिल्डराची 500-700 कोटींची जागा 3000 कोटींमध्ये विकत घेण्याचा प्रस्ताव पास केला.
किरीट सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालय उभं करण्यासाठी 7000 कोटी तसंच जमिनीसाठी 3000 कोटी तर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 2000 कोटी मंजूर केले गेले. पण हे सगळं करताना कायदेशीर कोणतीही प्रक्रिया पूर्ण केली गेली नाही. सोमय्या यांचा आरोप आहे कि उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात, आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांची, महानगरपालिका अधिकाऱ्यांशी किंवा त्यांच्या मित्रपक्षांशी चर्चा न करता कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा केली आणि या चर्चेच्या नंतर महापालिका आयुक्तांनी तातडीने हा प्रस्ताव पास करण्याची तयारी केली.
किरीट सोमय्या आंनी आरोप केला आहे की उद्धव ठाकरे यांना हे रुग्णालय उभं करायचे नाही. फक्त आपल्या जवळच्या बिल्डरला 2000 कोटींचा फायदा पोहोचवण्यासाठी हा घोटाळा केला जात आहे. सोमय्या यांचं म्हणणं आहे की त्यांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर हा प्रस्ताव सध्यासाठी थांबवण्यात आला आहे. राज्यपालांना भेटून त्यांना लोकायुक्तांकडून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश देण्याची मागणी करणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…
मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…