महाराष्ट्र

लोकसभेच्या निकालानंतर ठाकरे-भाजपाचं मनोमिलन? चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे तर्कवितर्कांना उधाण

भाजपा नेते तथा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसतानाही त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रभर फिरून त्यांच्या गटाच्या नऊ जागा निवडून आणल्या, असं म्हणत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आमच्याबरोबरची (भारतीय जनता पार्टी) युती तोडली नसती तर राज्यात भाजपा आणि शिवसेनेने पुन्हा एकदा सर्वाधिक जागा जिंकल्या असत्या आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला घरी बसावं लागलं असतं. मात्र उद्धव ठाकरे यांनी युती तोडली. ते महाराष्ट्रभर फिरले आणि याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा झाला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाची युती असताना उद्धव ठाकरेंच्या पक्षाला राज्यात २३ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी १८ जागांवर त्यांचे उमेदवार जिंकले होते. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वात जास्त कष्ट कोणी घेतले असतील तर ते केवळ उद्धव ठाकरे यांनी घेतले. ते आमचे मित्र असल्यामुळे मला त्यांची काळजी वाटायची. कारण आपल्यापैकी अनेकांना आजारपणं असतात, तशी त्यांचीही काही आजारपणं आहेत. त्यावर मात करून ते महाराष्ट्रभर फिरले. या मेहनतीचं फळ म्हणून त्यांचे नऊ खासदार निवडून आले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने शिवसेना-भाजपा युतीच्या बाजूने कौल दिला होता. तेव्हा जर आमचं युतीचं सरकार आलं असतं तर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना घरी बसावं लागलं असतं. मात्र यावेळी त्यांचे १३ (काँग्रेस) आणि आठ (शरद पवार गट) खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीचं आत्मपरीक्षण करायला हवं. मी काही उद्धव ठाकरेंना सल्ला देणारा माणूस नाही. मात्र सध्याची परिस्थिती पाहता मला वाटतं की त्यांनी आत्मपरीक्षण करून पाहावं की या निवडणुकीतून किंवा युती तोडून त्यांनी काय मिळवलं? त्यांच्या हाती काय लागलं?

भाजपा नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या खासदारांवर अल्पसंख्यांकांच्या मतावर निवडून आलेले असा ठपका बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्याने फार चांगली पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांचा हा भगवा विजय नसून हा हिरवा विजय आहे. तसेच त्यांच्या खासदारांची संख्या १८ वरून ९ झाली आहे. २०१९ प्रमाणे भाजपा आणि शिवेसना हे पक्ष एकत्र राहिले असते तर आज निवडणुकीच्या निकालाचं चित्र वेगळं असतं, तसेच त्यांच्या पक्षाची वाताहत झाली नसती. मात्र या सगळ्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने भरपूर फायदा करून घेतला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

7 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

7 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

7 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago