बीड: बीड जिल्ह्यातील गेवराई जवळ कार आणि ऑईल टँकरचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबादकडे जात असताना वंचितच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात वंचित बहुजन आघाडीच्या चार पदाधिकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. लातूरचे वंचितचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचा मृतात समावेश आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, लातूरचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे हे आपल्या कार्यकरत्यासह औरंगाबादला कामानिमित्त कार (क्रं.एम.एच.46 बी.9700) मधून जात होते. गेवराई शहरातील झमझम पेट्रोल पंपाच्या पाठिमागे असलेल्या बायपास रोडवर कार येताच, कारचालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्ता ओलांडून समोरून येत असलेल्या इंडीयन ऑईलच्या कंन्टेनर (क्रं.जी.जे.16, ए.यू.2475) ला धडकली. मृतांमध्ये सदाशिव भिंगे, संतोष भिंगे, महादेव सकटे, सुभाष भिंगे यांचा समावेश असून राम भिंगे हे गंभीर जखमी असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दु:ख व्यक्त करत मयतांना श्रध्दांजली वाहिली आहे.
अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…