मुंबईः महाराष्ट्रात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. देशात सर्वाधिक फटाक्यांची विक्री मुंबईत होते. दरवर्षी देशात होणाऱ्या एकूण फटाका विक्रीपैकी जवळपास २५ टक्के विक्री मुंबईत होते. महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी घातल्यास ही विक्री होणार नाही आणि फटाक्यांची बाजारपेठ कोलमडेल, अशी भीती व्यक्त होत आहे.
फटाक्यांच्या विक्रीपैकी ८० टक्के विक्री ही दिवाळीत होते. दिवाळीत एका मागून एक राज्यांनी फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घातल्यास फटाका व्यवसाय अडचणीत सापडण्याचा धोका आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगर प्रदेश तसेच सांगली, जळगाव, नाशिक आणि औरंगाबादच्या काही भागांमध्ये फटाक्यांशी संबंधित व्यवसायावर शेकडो कुटुंबं अवलंबून आहेत. दिवाळी जेमतेम काही दिवसांवर आली असताना फटाक्यांवर बंदी घातल्यास अनेकांचे प्रचंड नुकसान होईल.
कोरोना संकटातून सावरत असलेल्या महाराष्ट्रात फटाक्यांची विक्री करण्यासाठी सरकारी नियमांचे पालन करुन ठिकठिकाणी सुरक्षित गोदामांमधून कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांचा मोठा साठा करण्यात आला आहे. आयत्यावेळी बंदीचा आदेश आला तर या फटाक्यांसाठी पर्यायी बाजारपेठेचा शोध घेणे कठीण होईल. शिवाय नव्याने फटाक्यांची वाहतूक करण्यासाठी होणाऱ्या खर्चामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होईल. याच कारणामुळे फटाक्यांच्या विक्रीवर बंदी आणण्यास व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे.
अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…