महाराष्ट्र

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद, दानवेंच्या गंभीर आरोपांवर फडणवीसांचं उत्तर

नागपूर : बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद नागपुरातील हिवाळी अधिवेशनातही उमटले. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करताना “राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्ष या हत्येत सहभागी आहे” असा थेट आरोप केला. तसेच राष्ट्रवादीशी संबंधित बीड जिल्ह्यातील मंत्रीही संपर्कात आहेत, असेही दानवे म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपींना अटक करण्याचं आश्वासन देत, कुठल्याही मंत्र्याकडे बोट न दाखवण्याचं आवाहन केलं.

अंबादास दानवे म्हणाले कि, मस्साजोग येथील सरपंचाला ज्या पद्धतीने मारहाण झाली, ती पाहिली तर हृदयालाही पीळ येईल. यात सहा आरोपी आहेत, दुर्दैवाने सांगावं लागेल की राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा तालुका अध्यक्षही यात सहभागी आहे, तीनच आरोपी पकडले आहेत, तिघे फरार आहेत.

दानवे यांनी इतर काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. गुन्हा घडल्यानंतर ‘बाप तो बाप रहेगा’ असं पोस्टर पोलीस स्टेशनसमोर लावलं गेलं. गुन्हेगार जर खून करुन असं म्हणत असेल, तर त्यांचे सीडीआर तपासावेत. कोणी कोणी यांना फोन केला, कोणकोणत्या राजकीय पक्षांशी ते संबंधित आहेत. दानवे यांनी आरोप केला की, बीड जिल्ह्यातील एक मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहे आणि आरोपींना फोन करून मदत केल्याचे लोक सांगतात. त्यांनी मागणी केली की आरोपींवर त्वरित कारवाई केली जावी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली कि, बीड जिल्ह्यातील मस्साजोगला घडलेली घटना अतिशय गंभीर आहे. एका तरुण सरपंचाचा निर्घृण प्रकारे खून करण्यात आला. तीन आरोपींना अटक केलेली आहे, काही अद्याप फरार असले, तरी त्यांना शोधून काढून निश्चितच अटक करु. मी विरोधीपक्ष नेत्यांना सांगू इच्छितो, की आरोपी कुठल्या पक्षाचा आहे, जातीचा किंवा धर्माचा आहे, कोणती भाषा बोलतो, कोणाशी संबंधित आहे, असा विचार न करता, जो खरोखर घटनेत सहभागी असेल, त्यावर कारवाई केली जाईल, यासाठी ही केस सीआयडीला ट्रान्सफर केली आहे. एसआयटी चौकशी करायला सांगितलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले कि, माझी विनंती आहे, हे सर्वोच्च सभागृह आहे. इथे जेव्हा आपण बोलतो, तेव्हा ते १४ कोटी जनतेपर्यंत जातं. ज्यावेळी आपण मंत्र्यांच्या जवळचे वगैरे बोलतो, त्यावेळी विनाकारण ज्यांचा सहभाग नसतो, त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश होतो, आरोपीला वाचवा असा सरकारवर कोणाचाही दबाव नाही. जे आरोपी निष्पन्न होतील, आम्ही तांत्रिक आणि एआयच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी शोधून काढतो. मी आश्वस्त करु इच्छितो, की कुणीही गुन्हेगार असो, त्यांना सोडणार नाही. ज्या पोलिसांनी जाणीवपूर्वक यात कामचुकारपणा केला, त्यांच्यावर कारवाई झाली आहे, अजून कोणी सहभागी सापडला तर कारवाई केली जाईल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचे आकस्मिक निधन, चाहत्यांमध्ये शोककळा

मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…

2 दिवस ago

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…

2 दिवस ago

तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…

2 दिवस ago

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

3 दिवस ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

5 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

1 महिना ago