Ratnagiri Ex-Chairman Swapnali Sawant Missing Case, Husband Burns Her And Threw The Ash In Sea
रत्नागिरी: रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत बेपत्ता प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. स्वप्नाली सावंत यांना जाळून मारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींमध्ये स्वप्नाली सावंत यांच्या पतीचाही समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पती सुकांत उर्फ भाई सावंत, रुपेश उर्फ छोटा भाई कमलाकर सावंत आणि प्रमोद बाबू गावनांक यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १ सप्टेंबर रोजी कट कारस्थान करून तिन्ही आरोपींनी स्वप्नाली यांना जाळून मारलं. स्वप्नाली सावंत आणि त्यांचा पती दोघांमध्ये अनेकदा वाद होत असत. एकमेकांशी फारसे पटत नव्हते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. पण, या हत्येमागचं नेमक कारण अद्याप समजू शलकेले नाही. या प्रकरणात शहर पोलिसांनी या ३ जणांना आज सकाळी अटक केली आहे.
स्वप्नाली सावंत या दिनांक १ सप्टेंबर पासून त्यांच्या मिऱ्या येथील घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचे पती सुकांत उर्फ भाई सावंत यांनीच शहर पोलीस ठाण्यात केली होती. दरम्यान, रत्नागिरी पोलिस गेले ८ दिवस कसून तपास करत होते. यामध्ये डॉग स्कॉडचीही मदत घेण्यात आली होती. संशयित आरोपींनी स्वप्नाली सावंत यांना जाळून मारल्यानंतर राख समुद्रात टाकली होती. त्यामुळे कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागत नव्हता. रत्नागिरी शहर पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावत या तपासात यश मिळवले आहे.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…