महाराष्ट्र

‘या’ तारखेपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता…

पुणे : देशभरात आत्तापर्यंतच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत आठ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. वायव्य, ईशान्य आणि पूर्व भारतामध्ये अनेक ठिकाणी पावसाची तूट आहे. २१ ऑगस्टपर्यंत मान्सूनचा पाऊस वायव्य आणि मध्य भारतात बरसेल, असा अंदाज आहे. यासोबतच ऑगस्ट अखेरीस आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

काल (गुरुवारी) वर्तवण्यात आलेल्या पुढील चार आठवड्यांच्या अंदाजानुसार २६ ऑगस्टनंतर कोकणासह राज्यात पाऊसमान सुधारण्याची अपेक्षा आहे. २० ते २६ ऑगस्ट या कालावधीत मात्र कोकणात जास्त पाऊस नसेल. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पाऊस अपेक्षित आहे. २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर तसेच २ सप्टेंबरनंतर पावसाचे प्रमाण वाढू शकते. महाराष्ट्रामध्ये सध्या सरीसरीहून सात टक्के पाऊस अधिक नोंदवला गेला आहे. आत्तापर्यंत राज्यात ७२८ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ७७७ मिलीमीटरपर्यंत पाऊस नोंदला गेला आहे.

राज्यात पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमधील तुरळक ठिकाणांचा समावेश आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वायव्य महाराष्ट्र, बिहार येथे हळुहळू पावसाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. १९ ते २३ ऑगस्ट दरम्यान बिहार, पूर्व उत्तर प्रदेश येथे २३ ऑगस्टपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल. यात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला दिसेल. पुढील दोन दिवसांमध्ये मध्य भारत आणि नजीकच्या दक्षिण भारतामध्येही पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरात, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथे २१ ऑगस्टपर्यंत सर्वदूर पाऊस असेल. यातही तुरळक ठिकाणी मुसळधार सरींची शक्यता आहे.

कोकणात सात टक्के, मध्य महाराष्ट्रात आठ टक्के, मराठवाड्यात १८ टक्के पाऊस आत्तापर्यंतच्या सरासरीच्या अतिरिक्त आहे. तर विदर्भात नऊ टक्क्यांची पावसाची तूट आहे. विदर्भातील चार जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. या पार्श्वभूमीवर ऑगस्ट आणि सप्टेंबर अखेरीस पडणारा पाऊस दिलासा देईल, अशी अपेक्षा आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

1 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago