अहमदनगर : विधानसभेत यश मिळाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मतदारसंघात सक्रीय झाले आहेत. ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी त्यांनी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांना अनेक विषयांवर प्रतिक्रीया दिल्या. ते म्हणाले कि, “माझ्यामागे ग्रामदैवत म्हसोबा महाराजांचा नेहमीच आशिर्वाद राहिलाय. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचा देखील आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यांनी मला दिलेल्या संधीच सोनं करत मी चांगलं काम करून दाखवलंय. त्यामुळे जो विश्वास माझ्यावर आधी दाखवला गेलाय तो विश्वास पुन्हा पक्षनेतृत्व व्यक्त करील अशी मला खात्री आहे.”
श्रीरामपुर मध्ये महायुतीच्या आपआपसातील मतभेदामुळे ती जागा गेली. ती जाण्याचं खरतर कारण नव्हतं. दुर्दैवाने राम शिंदे यांचा देखील फार कमी फरकाने पराभव झाला. तेथे काही स्थानिक परिस्थिती उद्भवली असेल. नाहीतर जिल्हा हा 12 – O केला असता. बाळासाहेब थोरातांच जे स्वप्न होतं कि जिल्हा 12 – 0 झाला पाहिजे ते आम्ही निश्चितच पुर्ण केल असतं, असा टोला विखे पाटलांनी थोरातांना लगावला.
मंत्रीपदाबाबत काय म्हणाले पाटील ?
मंत्रीपदाबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्रजींनाच आहेत. त्यामुळे वेगळं काही मागण्याचं कारण नाही. पक्षनेतृत्वाचा जो माझ्याबद्दल विश्वास आहे त्यावरून मला खात्री आहे कि निश्चितपणे ते चांगली जबाबदारी मला देतील त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
एकनाथ शिंदे नाराज नाहीत
माध्यमांनी हे रान उठवलय की एकनाथ शिंदे नाराज आहेत. पण ते नाराज असण्याचं काही कारण वाटत नाही. उलट पक्षनेतृत्व जो निर्णय देईल तो मी मान्य करेन अशी भुमिका त्यांनी घेतली आहे. आमची पहिली पसंती हि देवेंद्र फडणवीस यांनाच असल्याचं देखील विखे पाटील म्हणाले.
उद्धव ठाकेरंची बेताल विधानं
ठाकरे गट स्वतंत्र निवडणुक लढवणार का? असे विचारले असता “पराभव झाल्यानंतर एकमेकांवर खापर फोडण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या सगळ्या पळवाटा आहेत. जनाधार गमावलाय ते कुठं तरी त्यांनी मान्य करायला हवं. उद्धव ठाकेरंनी मोदी आणि शहांवर बेताल विधानं केली. एवढं बेताल विधान करणारा माणूस मी पाहिला नाही, त्याचं शासन त्यांना लोकांनी दिलंय.” असं विखे पाटील म्हणाले.
बच्चु कडूंनी विश्वासघात केला
बच्चु कडूंना महायुती सरकारने पाठबळ दिलं. सरकारने दिव्यांगाची धोरणं मान्य केली. त्याच्याशी प्रतारणा करून बच्चु कडू यांनी जो विश्वासघात केला, त्यामुळे त्यांना महायुती मध्ये सामिल करून घेऊ नये अशी आमची अपेक्षा आहे असे पाटील म्हणाले.
विखे पाटलांची शरद पवारांवर टीका
EVM विरुद्ध मविआने उचललेल्या पाऊलाबाबत पत्रकारांनी विचारल्यावर, “लोकसभेत आघाडीला घवघवीत यश मिळालं आणि महायुतीची पिछेहाट झाली , त्यावेळी EVM वर का शंका व्यक्त केली नाही ?EVM वर विश्वास नाही म्हणून त्यांच्या खासदारांनी त्यावेळी राजीनामा देवून टाकायला हवा होता. निवडणुक नाकारायला हवी होती. जनमत स्वतःच्याबाजुने असलं की EVM चांगलं आणि विरोधात गेल की EVM वाईट! शरद पवार जाणते नेते आहेत, त्यांनी जनाधार गमावलाय त्यांनी आता घरी बसावं. लोकांचे वाटोळे तुम्ही केलेत, आणखी जनता आणि राज्याचं वाटोळं करू नका”, अशी टिका विखे पाटलांनी शरद पवारांवर केली.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…