पुणे : किरकोळ वादातून १५ वर्षीय भाच्याला त्याच्या मामाने चाकूने भोसकून ठार मारले. शुक्रवारी रात्री सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात शुक्रवारी रात्री ही घटना घडली. त्यानंतर पसार झालेल्या मामाला सिंहगड पोलिसांनी अटक केली.
गजानन गजकोश (वय १५, रा. धारावी, कोळीवाडा, मुंबई) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मेघनाथ अशोक तपासे (वय ४१, रा. मानाजीनगर, नऱ्हे) याला अटक करण्यात आली. याबाबत आरोपी मेघनाथचा मेहुणा मंगेश दत्तात्रय ओव्हाळ (वय ३१, रा. कृष्णाईनगर, मानाजीनगर गणपती मंदिराजवळ, नऱ्हे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन हा मामा मेघनाथ याच्याकडे राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी रात्री त्याचा मामाच्या मुलाशी वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात मेघनाथने भाचा गजाननला पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर चाकूने त्याच्या छातीवर वार केला. चाकूने भाेसकल्याने त्याचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. गंभीर जखमी झालेल्या गजाननला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी घटनास्थळी भेट दिली.
रात्री उशिरा आरोपी मेधनाथला अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात असे दिसून आले की, आरोपीने किरकोळ वादातून त्याच्या भाच्याचा चाकूने वार करून खून केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…