IT Professional Attacked with Machete on Pune Airport Road | Two Arrested
पुणे : पुण्यातील टेक कॉरिडॉरमध्ये सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनवणारी एक धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे घडली. विमानतळ रोडवरील अमर टेक पार्कजवळ ३३ वर्षीय आयटी कर्मचाऱ्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केला.
ही घटना पहाटे साडेतीनच्या सुमारास घडली. पश्चिम बंगालमधील मूळ रहिवासी असलेला पीडित आपल्या होणाऱ्या पत्नीला कामाच्या ठिकाणाहून घेण्यासाठी गाडीवर थांबला होता. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्याच्यावर झडप घालत कोयत्याच्या बोथट बाजूने मारहाण केली. यात त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाला असून पाठी व डोक्याला दुखापत झाली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर अवघ्या सहा तासांत पुणे पोलिसांनी जलद कारवाई करत हडपसर येथून दोन तरुणांना अटक केली. आरोपींची नावे बालाजी शिवाजी मुंडे (१९) आणि सिद्धार्थ ईश्वर दलिया (१९) अशी आहेत. त्यापैकी मुंडे याचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पोलीस तपासात या हल्ल्यामागील धक्कादायक कारण समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कॅब ड्रायव्हर मित्राने प्रेमसंबंधातून दुसऱ्या आयटी कर्मचाऱ्याला लक्ष्य करण्यास सांगितले होते. बराच वेळ संबंधित व्यक्ती दिसून न आल्याने आरोपींनी वैतागून दुसऱ्याच व्यक्तीवर हल्ला केला.
सुदैवाने, पीडित व्यक्तीची प्रकृती सध्या स्थिर असून त्याला उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी शस्त्राच्या धारदार बाजूऐवजी बोथट भाग वापरल्याने मोठा अनर्थ टळला.
या घटनेनंतर परिसरातील आयटी व्यावसायिक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. झोनल डीसीपी सोमय मुंडे यांनी सांगितले की, दोन्ही आरोपी ताब्यात असून तपास सुरू आहे. याप्रकरणी कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…
मुंबई : जलसंधारण महामंडळ आणि शासन अंतर्गत प्रकल्पांच्या बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने देण्याच्या सूचना…
मुंबई : नाशिक येथील बजाज इलेक्ट्रिक कंपनीतील ४१ कायमस्वरूपी कामगारांना व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता…
मुंबई : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बालगृहातील ७१५ विद्यार्थ्यांनी दहावीत यश संपादन करत सकारात्मक जीवनाचा…
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…