Entrepreneurs should come up with a consensual solution considering the financial problems of the workers
नागपूर : सूतगिरणी आणि इतर कंपन्या, उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कायमस्वरुपी आणि कंत्राटी कामगारांच्या विधायक मागण्यांचा साकल्याने विचार करुन त्यांच्या मागण्यांवर सर्वमान्य तोडगा काढावा. तसेच कामगारांनी कोविड काळात कंपन्यांच्या आर्थिक अडचणींचा विचार करुन कंपनी प्रशासनास सहकार्य करावे, जेणेकरुन दोघांनाही लाभ होईल, असे आवाहन कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज केले.
विदर्भ सिंचन भवन येथील सभागृहात जिल्ह्यातील विविध उद्योगातील कामगारांच्या मागण्यांचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी, कंपन्यांचे अधिकारी आणि कामगार या बैठकीला उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांपासून कोविड महामारीमुळे सर्वच उद्योग, व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. असे असले तरीही उद्योजकांनी, कंपनी प्रशासनाने कामगारांच्याही विधायक मागण्यांचा विचार करुन त्यांनी शक्य होईल अशी अधिकाधिक मदत करावी. आणि सर्वमान्य तोडगा काढावा, असे आवाहन कडू यांनी यावेळी उद्योजकांना केले. उद्योग अडचणीत असला तरीही कामगारांना दैनंदिन गरजा भागवताना त्यांची आर्थिक कुचंबणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच मागील थकबाकी लवकरात लवकर कामगारांच्या खात्यात जमा करावी. ही थकबाकीची रक्कम तीन किंवा चार टप्प्यात देताना सुरुवातीला अधिकाधिक ती रक्कम कामगारांना मिळेल, याकडे विशेष लक्ष द्यावे, तसेच कामगारांना विश्वासात घेऊन सर्वसमावेशक तोडगा काढून प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देशही दिले.
यावेळी सतरापूर गाव आणि कुही तालुक्यातील पुनवर्सित गावांमध्ये सौरऊर्जेची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा करावा तसेच भूसंपादनांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच हा प्रस्ताव तयार करताना वस्तुस्थितीदर्शक बाबींवर आधारित असावा. या गावासाठी लागणारे भूसंपादन करण्यासाठी आवश्यक भूमी मिळण्यासाठी वनविभाग आणि जलसंपदा विभागांच्या जमिनीचा प्रस्ताव तयार करून हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिले.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…