Mumbai Court rejects bail applications of Aryan Khan
मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज आज मुंबईतील किल्ला कोर्टच्या दंडाधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. त्यामुळे आर्यन खानचा अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. याचा अर्थ आर्यन खानला सध्या तुरुंगात राहावे लागेल.
कालची रात्र आर्यनसह इतर आरोपींनी तुरुंगाऐवजी एनसीबी कार्यालयात काढली. आज त्यांना जे जे रुग्णालयात तपासणी करून आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले, तर मुनमुन आणि नुपूर यांना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आले आहे. आर्यनसह इतर आरोपींना ३- ४ दिवस क्वारंटाईन सेलमध्ये ठेवण्यात येईल. दरम्यान, निकालाची प्रत मिळाल्यानंतर तातडीने सत्र न्यायालयात जाणार असल्याचं आर्यनच्या वकिलांनी सांगितलं आहे.
आर्यन खानची याचिका मुंबईच्या किल्ला कोर्टाने फेटाळली आहे. न्यायालयाने म्हटले की, त्यांना या प्रकरणाची सुनावणी घेण्याचा आणि जामिनावर कारवाई करण्याचा अधिकार नाही. हा अर्ज सत्र न्यायालयात करायला हवा होता. युक्तिवादादरम्यान, मानेशिंदे यांनी आर्यन खानला जामीन मिळावा अशी कोर्टाकडे मागणी केली. त्यासाठी त्यांनी कोर्टाला एकूण 22 निकालांचा हवाला दिला. तसेच आर्यन खानकडे ड्रग्ज सापडलं नाही, असेदेखील ते म्हणाले. आरोपींना जामीन देण्याबाबत जे अधिकार हायकोर्ट आणि सेशन कोर्टला आहेत. तेच अधिकार महानगरीय कोर्टालाही आहेत. आर्यनकडे काहीही सापडलेलं नाही, एक ग्रॅमदेखील ड्रग्ज सापडलेले नाही. म्हणून जामीन मिळावा. आर्यन खानकडे चॅटशी निगडित मटेरियल सापडलं आहे. तो जामिनास पात्र आहे.
ते पुढे म्हणाले की आरोपी जामिनावर असूनसुद्धा चौकशीला सहयोग करू सकतो. जेव्हा बोलावलं जाईल तेव्हा चौकशीसाठी यायला तयार आहे, असा युक्तिवाद मानेशिंदे यांनी केला. तर NDPS Act नुसार दाखल केलेले सर्व गुन्हे हे अजामीनपात्र आहेत, असा दावा एनसीबीतर्फे वकील एएसजी सिंग यांनी केला. हा युक्तिवाद तब्बल अडीच तास चालला. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…