राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरं खुली करण्यासंबंधी विचारणा केली आहे. सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये ? अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमधील निर्बंध राज्य सरकारकडून शिथील करण्यात येत आहे. २ सप्टेंबरपासून अनलॉकच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. मात्र मंदिरं खुली करण्यासंबंधी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?
पुढे त्यांनी लिहिलं आहे की, “लॉकडाउनच्या काळात आषाढीची वारी असो, गोपळकाल्याचा उत्स्व असो की गणेशोत्सव असो..राज्यातील हिंदू बांधवांनी कमालीचं सामंजस्य दाखवलं आहे. सरकारच्या आदेशाचं अत्यंत समजूतदारपणे पालन केलं आहे. उद्या मंदिर उघडली तर या राज्यातील माझा हिंदू बांधव आखून दिलेले नियम काटेकोरपणे पाळेल याची मला खात्री आहे.”
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…