‘जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? इकडून तिकडून गोळा केलेले लोक तिथं आहेत. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले तरी त्यांना काही कळत नाही. माझ्या मते डॉक्टरपेक्षा कम्पाऊंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरकडून औषध घेत नाही, कम्पाऊंडरकडून घेतो,’ असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी केलं होतं. त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेनं (MARD -Maharashtra Association of Resident Doctors) राऊत यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
एकीकडे डॉक्टरांना करोना योद्धे म्हणायचं आणि दुसरीकडं आपल्याच सहकाऱ्यांनी अशी वक्तव्यं करायची याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? अनेक दिवसांपासून घरी न जाता, आईवडिलांचे तोंडही न पाहता जिवाची बाजी लावून अनेक डॉक्टर काम करत आहेत. डॉक्टरांनी अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणलं ते हे ऐकण्यासाठीच का? डॉक्टरांना काही कळत नसेल तर सरकारने डॉक्टरांचे कृती दल कशासाठी तयार केले,’ अशी विचारणा ‘मार्ड’नं पत्रातून केली आहे.
राऊत यांनी केलेलं वक्तव्य तरुण डॉक्टरांचं खच्चीकरण करणारं आहे. आपली सुद्धा अशीच अधिकृत भूमिका आहे का? असा प्रश्न ‘मार्ड’नं केला आहे. तसं नसेल तर संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा, त्यांनी मांडलेली भूमिका हीच आपली अधिकृत भूमिका आहे, हे गृहित धरून डॉक्टर रस्त्यावर उतरतील,असा इशारा देखील देण्यात आलेला आहे.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…