Maharashtra Accident News 18 Years Old Student From Gujarat Dies At Nashik Waterfall
नाशिक : साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरुन पडल्याने विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातील पिंपळसोंड उंबरपाडा तातापाणी येथे घडली आहे. पिंपळसोंड उंबरपाडा येथील गरम पाण्याच्या झऱ्यांजवळ हा अपघात घडला. सुरत येथून सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सुमारे दीड हजार फूटांवरुन पाय घसरुन पडून खडकावर आपटल्याने पर्यटक विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला. हा विद्यार्थी गुजरात राज्यातून आपल्या महाविद्यालयातील दहा ते बारा मित्रांसमवेत आला होता. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तक्षिल संजाभाई प्रजापती ( वय १८ वर्ष) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
तक्षिल हा सुरत येथील सार्वजनिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणारा विद्यार्थी होता. त्याच्या दहा ते बारा मित्रांसमवेत पिंपळसोंड येथील कुंडा रिसोर्ट येथे तो सहलीसाठी आला होता. दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास हे सर्व जण उंबरपाडा तातापाणी येथील साखळचोंड येथील वाहूटचोंड शॉवर पॉईंट धबधब्यावर आंघोळ करीत होते. यावेळी खडकावर शेवाळ असल्याने त्याचा पाय घसरुन पंधराशे फूट खाली पडून खडकावर आपटल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळवताच पोलीस व वन कर्मचारी अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानंतर सुमारे दीड हजार फूट खोल दरीतून पंचनामा करून मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने तिवशाची माळी येथे रस्त्यावर काढण्यात आला. त्यानंतर पाच वाजताच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर पोलिसांनी तसेच वन विभागाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…