हिंजवडी आयटी पार्कमध्ये फुटपाथवर चढलेल्या बसचा भीषण अपघात.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात पुन्हा एकदा बेफाम वेगाचा कहर पाहायला मिळाला. गर्दीच्या वेळी कंपनीची बस अचानक फुटपाथवर चढत दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर वाहतूक आणि रस्ते सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या अपघातांच्या मालिकेत सोमवारी आणखी एक भीषण घटना घडली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पंचरत्न चौकाजवळ कंपनीच्या कर्मचाऱ्यांना नेणारी बस अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि ती थेट फुटपाथवर चढली. गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने पादचाऱ्यांना सुटण्याची संधीही मिळाली नाही.
या अपघातात अर्चना देवा प्रसाद (८) आणि तिचा भाऊ सूरज देवा प्रसाद (६) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची बहिण प्रिया देवा प्रसाद (१८) गंभीर जखमी असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पादचारी अविनाश चव्हाण आणि बसमधील काही प्रवासीही जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकड या व्यस्त मार्गावर झाला. साक्षीदारांच्या मते, कंपनीची बस अतिवेगात होती आणि चालकाने ताबा गमावल्यानंतर वाहनाने थेट चालत जाणाऱ्या नागरिकांवर धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की परिसरात काही क्षणांतच भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काही काळ तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाली होती, ती पोलिसांनी तात्काळ सुरळीत केली.
हिंजवडी परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अवजड वाहनांची गर्दी आणि वारंवार होणारे अपघात या मुद्द्यांवर नागरिक सातत्याने आवाज उठवत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर “बेफाम वेग थांबणार कधी?” असा तीव्र रोष नागरिकांनी व्यक्त केला. अधिक कडक सुरक्षा उपाय, वेगनियंत्रण व पादचारी संरक्षणाच्या मागण्या पुन्हा जोर धरू लागल्या आहेत.
सारांश : महत्त्वाच्या घडामोडी एकाच नजरेत
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…