महाराष्ट्र

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; सतर्क राहण्याच्या सूचना

मुंबई : भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS)तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांला १९ ऑगस्ट रोजी सकाळी ५.३० ते २१ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० पर्यंत ३.४ ते ४.४ मीटर तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्याला १९ ऑगस्ट रोजीपासून सायं. ५.३० ते २१ ऑगस्ट दुपारी २.३० पर्यंत २.९ ते ४.० मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी ५०-६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्राची धूप आणि उंच लाटांचे तडाखे समुद्र किनारी येण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या कालावधीत संबधित जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

राज्यात पुढील २४ तासासाठी रायगड, पुणे घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर नंदुरबार, नाशिक घाट, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुबई उपनगर, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आले असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, रायगड जिल्ह्यातील अंबा, सावित्री या नद्यांनी धोका पातळी पार केली आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी, कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असल्याने जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय सैन्य दलाच्या ७२ जवानांची कंपनी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक, DRF नांदेड तालुका मुखेड येथे कार्यरत असून आतापर्यंत २९३ नागरिकांना सुखरूप स्थळी हलविण्यात आले आहे.

भारतीय हवामान विभाग व राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र (एनआरएससी) या केंद्रीय संस्था सोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राद्वारे SACHET platform चा वापर करून हवामानाचे ४१ अलर्टद्वारे ५४ कोटी एसएमएस च्या नागरिकांपर्यंत पोहचवण्यात आले आहेत. तर मुंबईत २४ विविध ठिकाणी पाणी साचले होते, पाणी पंपाद्वारे निचरा करण्यात आले आहे. मुंबई येथील असणारी भरती व ओहोटी : ओहोटी – सायंकाळी ४:३५ १.९१ मीटर, भरती रात्री ९:५५ ३.३४ मीटर.

अलमट्टी धरणाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात होणारा मुसळधार पाऊस आणि कृष्णा नदी (कल्लोल बॅरेज) आणि घटप्रभा नदी (लोलासूर ब्रिज) मधून होणारा विसर्ग लक्षात घेता, अलमट्टी धरणाकडे येणारा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच, नदीकडे जाणारा प्रवाह सध्याच्या २,००,००० क्युसेकवरून २० ऑगस्ट २०२५ रोजी २,५०,००० क्युसेकपर्यंत वाढवला जाईल.

मुंबई येथील वडाळा ते चेंबूर दरम्यान मोनोरेल मैत्रीपार्क येथे बंद पडली असता राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने समन्वय करून अग्निशमन दलास पाचारण केले व सदर मोनोरेल मध्ये ५८३ प्रवासी सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहेत. सुर्यानगर, विक्रोळी व खिंडीपाडा, भांडूप येथील संभाव्य भूस्खलनाच्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या लोकांची तात्पुरती निवास व्यवस्था जवळच असणाऱ्या एसआरए इमारतींमध्ये करण्यात आली होती व त्यांच्याकरिता खानपान व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील भोर येथील अंबाडे घाट येथील दरड कोसळली होती परंतु तत्काळ मलबा हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली असून पालघर जिल्ह्यातील वसई येथे मोरी गावात अतिवृष्टीमुळे पुरात अडकलेल्या ७० नागरिकांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकामार्फत सुखरूप सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड व जलगाव गावतल्या रस्त्यावर पाणी साठल्याणे हा मार्गावरील वाहतुक सुरक्षेस्तव बंद करण्यात आली आहे.

सांगली शहरातील पूरग्रस्त भागातून ४७१ लोकांना बाहेर काढले आहे. पुराचे पाणी त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्यांना स्थलांतरित करण्यात आले. बहुतेक लोक त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेले आहेत. काही लोक महानगरपालिकेच्या निवारागृहात देखील असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम
Tags: Alibag high tideAlmatty dam inflowAmbade ghat landslideCoastal Maharashtra alertDRF rescue operationDRF बचाव कार्यEmergency managementINCOIS wave warningINCOIS लाटेचा इशाराKolhapur rainfallMaharashtra heavy rainfall updateMaharashtra weather updateMonsoon 2025 MaharashtraMonsoon rescue operationsMumbai flood alertMumbai Monsoon 2025National Disaster ResponsePalghar orange alertPune MonsoonRaigad red alertRatnagiri flood alertRiver flood alert MaharashtraSACHET SMS alertSACHET SMS अलर्टSindhudurg high tideThane heavy rainVasai flood evacuationअंबाडे घाट भूस्खलनअलमट्टी धरणाचा प्रवाहअलिबाग उच्च लाटाआपत्कालीन व्यवस्थापनकिनारी महाराष्ट्र अलर्टकोल्हापूर पाऊसठाणे मुसळधार पाऊसनदी पूर इशारा महाराष्ट्रपालघर ऑरेंज अलर्टपुणे मान्सूनमहाराष्ट्र अतिवृष्टीचा अपडेटमहाराष्ट्र हवामान अपडेटमान्सून २०२५ महाराष्ट्रमान्सून बचाव कार्यमुंबई पूर इशारामुंबई मान्सून २०२५रत्नागिरी पूर इशारारायगड रेड अलर्टराष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलवसई पूर स्थलांतरसिंधुदुर्ग उच्च लाटा

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago