Health screening camp completed in Parli
परळी : श्री ष.ब्र. १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली थोरला मठ संस्थान वसमत आयोजित वसमत ते श्री क्षेत्र कपिलाधार पदयात्रा मागिल १२ वर्षा पासुन आयोजित करण्यात येते . हजारो भाविकांचा त्या पदयात्रेत सहभाग असतो. या वर्षी भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले त्यात ४०० व्यक्तीहून अधिक लोकांनी घेतला शिबिराचा लाभ घेतला.
रेवली फाटा, परळी जिल्हा बिड येथे डॉ भाग्यश्री नरवाडे (एम.डी.आयुर्वेद) यांच्या तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तपासणी व समुपदेशनाचा सुमारे ४०० व्यक्तीहून अधिक लोकांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात मोफत रक्तदाब, मधुमेह तपासणी, सांध्यांचे विकार , हृदयरोग, मूत्त्राशयाचे आजार, अजीर्ण-अम्लपित्त, बालरोग, स्त्री रोग, इत्यादी प्रकारच्या अजारांवर डॉक्टरांनी मोफत उपचार, औषधे व सल्ला दिला.
डॉ भाग्यश्री नरवाडे यांनी सांगितले की, बहुतांश आजारांचे कारण चूकीचा आहारविहार असतो. आयुर्वेद भारताला मिळालेला खजिना आहे, आयुर्वेद हा अथर्वेदाचा उपवेद असून यात जीवन जगण्याचे महामंत्र दिलेले आहेत. आयुर्वेदातील दिनचर्या – ऋतुचर्या पालन केल्यास डिसऑर्डर जसे की उच्चरक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार उत्पन्न होणार नाहीत किंवा आजार उत्पन्न झाल्यास आजार दुरुस्त होण्यास नक्कीच मदत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विष्णु राठोड, डॉ.शरद चोले, लॅब टेक्निशिअन व त्यांना अशोक कूबडे, छाया कुबडे, विश्वनाथ कंधारकर वैजनाथ नरवाडे इंजि. आशीष कुबडे, इंजि.सुनिता कुबडे, शुभम कंधारकर अमर नरवाडे व पदयात्रिल स्वयंसेवक यांचे सहकार्य लाभले.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…