महाराष्ट्र

राज्याच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा, जाणून घ्या महत्वाचे मुद्दे…

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर भर देण्यात आला असून, सरकारकडून या सर्वच क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा काण्यात आल्या आहेत. शेतकरी आणि महिला वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या आहेत.

अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा :

  • छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक स्थापन करण्यासाठी २५० कोटींचा निधी
  • कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देणार
  • महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्क्यांची तरतूद आता वाढवून ५० टक्के केली आहे.
  • ६० हजार कृषी पंपांना वीज जोडणी देणार
  • मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला १० कोटींचा निधी
  • शेततळ्यांसाठी आता ७५ हजार रुपयांचे अनुदान देणार
  • जलसंपदा विभागासाठी १३२५२ कोटींच्या निधीची तरतूद
  • गोसीखुर्द प्रकल्पासाठी ८५० कोटी रुपये उपलब्ध करून देणार
  • आरोग्य विभागासाठी ११ हजार कोटींच्या निधीची तरतूद
  • सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला आणि नवजात शिशू रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय
  • कर्करोग व्हॅनसाठी ८ कोटी रुपयांची तरतूद
  • तृतीयपंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार
  • उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी ११६० कोटींच्या निधीची तरतूद, शालेय शिक्षण विभागासाठी २३५४ कोटींच्या निधीची तरतूद
  • क्रीडा विभागासाठी ३५४ कोटींच्या निधीची तरतूद
  • ग्राम विकास विभागासाठी ७७१८ कोटींच्या निधीची तरतूद
  • नगरविकास विभागासाठी ८८४१ कोटींची तरतूद
  • गृहनिर्माण विभागाला १०७१ कोटींचा निधी प्रस्तावित
  • गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव, शिर्डी विमानतळासाठी १५०० कोटींचा निधी, रत्नागिरी विमानतळासाठी १०० कोटींचा निधी
  • सांस्कृतिक विभागासाठी १९३ कोटींच्या निधीची तरतूद
  • मुंबई महानगर क्षेत्राला जलमार्गाने जोडण्याचा निर्णय़
  • झोपडपट्टी विकास योजनेसाठी १०० कोटींचा निधी
  • मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव
  • ऊर्जा खात्यासाठी ९ हजार ६७ कोटींच्या निधीची तरतूद
  • राज्यामध्ये अडीच हजार सौर ऊर्जेचे प्रकल्प उभारणार
  • ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी नव्या आयोगाची स्थापना
  • कृषी विभागासाठी ३,०२५ कोटींचा निधी प्रस्तावित
  • पर्यटन विभागासाठी १४०० कोटींचा निधी प्रस्तावित
  • कामगार विभागासाठी १४०० कोटींचा निधी प्रस्तावित
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचे आकस्मिक निधन, चाहत्यांमध्ये शोककळा

मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…

3 दिवस ago

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…

3 दिवस ago

तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…

3 दिवस ago

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

4 दिवस ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

6 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

1 महिना ago