महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची कबुली – लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका, कांदा, दूध, कापसाच्या दरांवरून रोष भोवला…

मुंबई : राज्यात गेल्या दोन वर्षांत दुष्काळ, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना सरकारने १५ हजार कोटींची नुकसानभरपाई दिली. मात्र कांदा, दूध, कापूस आणि सोयाबीनच्या दरावरून शेतकऱ्यांच्या नाराजीचा महायुतीला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली. शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी लवकरच केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाचे अध्यक्ष विजय पाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी पश्चिम भारतातील राज्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. कृषीमंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा, दीव आणि दमणचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे यांनी महायुती सरकारचे शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. शेतमालाला चांगली किंमत व बाजारपेठ मिळावी यासाठी पंतप्रधानांसमोर आपले म्हणणे मांडल्याचे त्यांनी सांगितले. कांदा निर्यातबंदीचा घोळ, दूध दर तसेच सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने साडे चार हजार कोटींच्या मदतीची व्यवस्था केली होती. मात्र ही मदत वेळेत न पोहोचल्याने नाराजीचा फटका बसल्याचे शिंदे म्हणाले.

राज्यातही महायुतीचे सरकार गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे. केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या माध्यमातूनदेखील पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. भरडधान्याचा प्रसार करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करीत असून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मायक्रो मिलेट्सनाही एमएसपी देण्याची मागणी त्यांनी केली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 दिवस ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 आठवडा ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 आठवडे ago

शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने द्यावे – मंत्री संजय राठोड

मुंबई : जलसंधारण महामंडळ आणि शासन अंतर्गत प्रकल्पांच्या बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने देण्याच्या सूचना…

2 आठवडे ago

कामगारांना सक्तीची सेवानिवृत्ती देणाऱ्या कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करा, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश

मुंबई : नाशिक येथील बजाज इलेक्ट्रिक कंपनीतील ४१ कायमस्वरूपी कामगारांना व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता…

2 आठवडे ago

बालगृहातील ७१५ बालके दहावीत उत्तीर्ण; मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन !

मुंबई : प्रतिकूल परि‍स्थितीवर मात करत बालगृहातील ७१५ विद्यार्थ्यांनी दहावीत यश संपादन करत सकारात्मक जीवनाचा…

2 आठवडे ago