farmers
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लसींच्या खरेदीसाठी 7 हजार कोटी रुपयांचा चेक लिहून ठेवला होता. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोफत लसी पुरवण्याची घोषणा केली. लसीकरणाचा संपूर्ण भार केंद्र सरकार उचलणार असून १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यांवर असणारा भार कमी झाला आहे. त्यामुळे आता ते 7 हजार कोटी रुपये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना द्यावे, असे मत माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केले आहे.
माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी ट्विट करत म्हटलं कि, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लशीकरिता 7 हजार कोटी रुपयांचा चेक लिहून ठेवला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मोफत लशी देऊन तो भार कमी केला आहे. त्यामुळे ते 7 हजार कोटी शेतकऱ्यांना देण्यात यावे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबोधनातील महत्वाचे मुद्दे, केल्या ‘या’ मोठ्या घोषणा
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…