मुंबई : राज्यात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने रत्नागिरी, नाशिक, बीड, परभणी, लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील ३-४ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकणात आज पुन्हा हाय अलर्ट असू शकतो.
येत्या २-3 दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पूर्व विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात सर्वाधिक प्रभाव राहणार असून कोकणातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. उत्तर कोकणात याचा सर्वाधिक प्रभाव राहणार आहे. आज पुणे, ठाणे, रायगड, पालघर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, औरंगाबाद, सांगली, सोलापूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड ह्या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात पुन्हा हाय अलर्ट देण्यात आला आहे.
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…