महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी काही करू शकलो नसतो तर राजीनामा तरी दिला असता – डॉ. सुजय विखे

अहमदनगर : थकीत वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करणे अन्यायकारक आहे. आपण जर मंत्री असतो तर हा अन्याय सहन केला नसता. यावर काहीच करू शकलो नसतो तर शेतकऱ्यांसाठी राजीनामा तरी दिला असता,’ असं भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटलं आहे. कर्डिले यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा राहुरीत डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

डॉ. सुजय विखे यांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले कि, “राहुरी तालुक्यातील जनतेच्या आशीवार्दाने येथील आमदाराला मंत्रिपद मिळाले. त्यातही शेतकऱ्यांच्या दृष्टीने ऊर्जा हे महत्वाचे खाते मिळाले आहे. मात्र, मंत्रिपद असून जर हे लोकप्रतिनिधी आपल्याच मदतदारसंघातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवू शकत नसतील तर त्याचा काय उपयोग? अशांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. आमचे सरकार असते तर आम्ही अशी वेळच येऊ दिली नसती. एकाही शेतकऱ्याच्या डीपीला हात लावू दिला नसता. बाकीच्या राज्याचे सोडा, पण किमान आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना तरी नक्कीच संरक्षण दिले असते. त्यावेळी जर अधिकाऱ्यांनी ऐकले नसते, तर शेतकऱ्यांसाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असता.”

विखे पुढे बोलताना म्हणाले कि, “आम्ही लॉटरी लागून मंत्री किंवा आमदार कधीच झालेलो नाही. आमच्या रक्तात संघर्ष आहे. आम्ही संघर्ष करून पदे मिळवतो. कोणी आमच्यावर उपकार केलेले नाहीत. सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेने आम्हाला डोक्यावर घेतल्याने आम्ही इथपर्यंत आलो आहोत. आम्ही त्या जनतेसाठी आहोत, ही भावना आमच्यामध्ये आहे.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश

ठाणे : ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश आलं आहे. ठाण्याची जागा शिवसेनाच…

3 दिवस ago

कचाकचा बटण दाबा प्रकरणात अजित पवारांना दिलासा, निवडणूक अधिकाऱ्यांकडून क्लीन चिट

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसरने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित 'मतासाठी निधी' या…

6 दिवस ago

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान

मुंबई, दि.२६ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजल्यापासून सूरु झाले…

6 दिवस ago

विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी घेतला मुंबई उपनगर जिल्ह्यातील निवडणूक तयारीचा आढावा

मुंबई, दि. 24 : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी नियुक्त अधिकारी आणि…

7 दिवस ago

मुंबईसह महाराष्ट्राला मतदानाच्या टक्केवारीत अग्रस्थानी आणावे – राज्य विशेष निरीक्षक धर्मेंद्र सिंग गंगवार

मुंबई, दि. 24 : महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मतदानाची टक्केवारी वाढवून…

7 दिवस ago

बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…

मुंबई, दि. २४ : बनावट चेक, सह्यांचा वापर करून शिक्षण विभागाचे ४७ लाख रुपये लंपास…

7 दिवस ago