Amit Shah addressing the media – Amit Shah speaks on Maharashtra's political future and the role of BJP in the state’s governance.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. या विजयानंतर राज्यात स्थापन झालेल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज (रविवारी) नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा विस्तार होणार आहे. परंतु, किती मंत्र्यांचा शपथविधी होणार आणि घटक पक्षांना किती मंत्रीपदे मिळणार याबद्दल अद्याप स्पष्टता आलेली नाही.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते अमित शाह यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत विधानसभा निवडणुकीतील विजय आणि शिवसेनेचे नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर भाष्य केले आहे.
अमित शाह म्हणाले, “महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत १०५ जागा जिंकल्या होत्या, मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळाला आहे. तुमच्या विश्लेषणाचा आधार चुकीचा आहे. गेल्या निवडणुकीतदेखील नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना बहुमत मिळालं होतं. शिवसेना ज्या जागांवर लढली त्या जागा आम्ही लढल्या नव्हत्या, त्यामुळे आम्ही जिंकू शकत नव्हतो. शिवसेना आमच्याबरोबर होती, त्यामुळे त्यांना बहुमत मिळालं होतं. आम्हाला संपूर्ण बहुमत मिळालं. मुख्यमंत्री बनण्याच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी विश्वासघात केला आणि महाराष्ट्राच्या जनतेशीही विश्वासघात केला.”
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आमच्याबरोबर विश्वासघात केला, जनतेने ते लक्षात ठेवले. त्यानंतर अडीच वर्षांत सरकारने केलेल्या विकासकामांमुळे आणि मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या सकारात्मक कामकाजाच्या जोरावर महायुतीला हा प्रचंड विजय मिळाला.”
राज्यात स्थापन झालेल्या महायुतीच्या सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीसे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत विचारले असता अमित शाह म्हणाले, “एकनाथ शिंदे नाराज असण्याचं काही कारण नाही. आमच्या जागा खूप जास्त आहेत. मागील वेळीही आमच्या जागा जास्त होत्या, पण आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवले आणि अडीच वर्ष त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभे राहिलो. यावेळी आम्ही सुरुवातीपासूनच सांगितले होते की, मुख्यमंत्री कोण असतील हे निवडणुकीनंतर निश्चित केले जाईल. त्यामुळे कोणीही नाराज होण्याची आवश्यकता नाही. कोणी नाराज नाही.”
मंत्रिमंडळ विस्तारास होणाऱ्या उशीराबद्दल अमित शाह म्हणाले, “आम्हाला काही अडचण येत नाही. सर्वकाही नियोजित कार्यक्रमानुसार चालू आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना जे घडत होते, त्यापेक्षा आम्ही तीन-तीन दिवस पुढे आहोत.”
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…