अहमदनगर

डॉक्टरची आरोग्य केंद्रातच आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलेल्या कारणामुळे अहमदनगर जिल्ह्यात खळबळ

अहमदनगर : डॉक्टरने आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या करंजी येथे ही घटना घडली. डॉ. गणेश शेळके असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरांचं नाव असून त्यांनी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येला तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे लिहीले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. गणेश शेळके हे आरोग्य अधिकारी म्हणून काम करत होते. डॉ शेळके यांना गेल्या 3 महिन्यांपासून पगार मिळालेला नव्हता. त्यातच त्यांना वरिष्ठांकडून पगार कपातीची देखील धमकी दिली जात होती. त्यामुळे त्यांनी आरोग्य केंद्रातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्त्येपूर्वी डॉ. शेळके यांनी सुसाईड नोटमध्ये आत्महत्त्येस तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान दराडे, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचे लिहिले आहे. तसेच, पगार वेळेवर नाही, अतिरिक्त भार आणि पगार कपात करण्याची धमकी देत असल्याने या सगळ्याला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. डॉ. गणेश शेळके यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून त्याचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

2 आठवडे ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

2 आठवडे ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

2 आठवडे ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

2 आठवडे ago