२९ जुलै हा दिवस व्याघ्रदिन म्हणून साजरा केला जातो. जगभरातील वाघांच्या संख्येपैकी ७० टक्के वाघ हे भारतात आहेत. काही वर्षांपूर्वी शिकार आणि इतर गोष्टींमुळे महाराष्ट्र आणि इतर राज्यांत वाघांची संख्या कमी व्हायला लागली होती. मात्र सरकारने तातडीने उपाययोजना आखत वाघांचं प्रमाण कसं वाढवलं जाईल याकडे लक्ष दिलं.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आजच्या दिवशी राज्यातील जनतेला व्याघ्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. व्याघ्रदिन हा एका दिवसापुरता मर्यादीत न राहता, निसर्गचक्र आणि पर्यावरणाचं संतुलन कायम राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहण्याची गरज आहे.महाराष्ट्राची वनसंपत्ती ही मोठी आहे. ज्या जंगलात वाघ असतो तिकडचं निसर्गचक्र हे उत्तम मानलं जातं. त्यामुळे निसर्गाचं संतुलन कायम राखण्यासाठी वाघांची जोपासना करणं ही काळाची गरज आहे. सरकारसोबत नागरिकांचीही ही जबाबदारी असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…