लाइफ स्टाइल

माणूस जास्तीत जास्त किती वर्षे जगू शकतो? वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा

माणूस जास्तीत जास्त किती वर्षे जगू शकतो? आपणास हे माहिती आहे का? वैज्ञानिकांनी याचा अंदाज लावला आहे की माणूस जास्तीत जास्त वर्षे जगू शकतो.

सिंगापूरमधील वैज्ञानिकांनी मनुष्याचे जास्तीत जास्त वय मोजण्यासाठी विशेष प्रकारचे निर्देशक तयार केले. या निर्देशकांना डायनॅमिक ऑर्गनायझेशन स्टेट इंडिकेटर (DOSI) म्हणतात. त्यावरून हे समजते की एखाद्या व्यक्तीचे शरीर जास्तीत जास्त किती वयापर्यंत त्याला आधार देऊ शकते. त्यासाठी एका विशेष पद्धतीने रक्ताच्या चाचण्या केल्या जातात. रक्ताची तपासणी केल्यानंतर या शास्त्रज्ञांनी त्यांनी तयार केलेल्या निर्देशकांबरोबर ती मॅच करून बघितली. त्यावरून माहिती मिळाली की जर आरोग्य चांगले असेल आणि सर्व परिस्थिती मानवी शरीरासाठी अनुकूल राहिली, तर तो 150 वर्षे जगू शकेल.

संशोधकांनी वय-संबंधित परिवर्तने आणि वय-कपात करण्याच्या मार्गांना एक मेट्रिकमध्ये ठेवून पाहिले. यातून संभावित जास्तीत जास्त वय समोर आलं. वय वाढणे किंवा वृद्धत्व येणे ही जीवशास्त्राच्या भाषेत त्या परिस्थिती असते, जेव्हा शरीराचे अवयव कमी काम करतात आणि शरीरात आजारांची लागण होत असते. मग तो कर्करोग, मानसिक समस्या किंवा हृदयाशी संबंधित एखादा आजार असो. दुसरे मोठे कारण म्हणजे शरीराच्या डीएनएचे सतत विभाजन होत जाते. यामुळे, रोगांचा शरीरावर जास्त परिणाम होतो आणि शरीर व त्याची काही अंग साथ देणे थांबवतात.

आता रक्ताच्या चाचण्यांद्वारे वयाबद्दल माहिती करून घेण्याबद्दल बोलूया. शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेतले. त्या संपूर्ण रक्ताची तपासणी करण्यात आली, CBC काढण्यात आला. या चाचणीत, पांढऱ्या रक्त पेशी, लाल रक्त पेशी आणि रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण पाहिले जाते. वय-कपात करण्याच्या ट्रैजेक्टरी आणि सीबीसीचा डेटा बघून असे आढळले की कोणत्या वयात, कोणत्या संभाव्य रोगामुळे शरीरावर काय परिणाम होऊ शकतो. तसेच, शरीर किती प्रकारच्या आजारांशी लढा देऊ शकेल.

हे इंडिकेटर्स शरीराची शारीरिक क्षमता सांगतात. ज्या लोकांची जीवनशैली चांगली नसते, अशा लोकांची DOSI सांगते की ते कमी वयापर्यंत जगतात. DOSI नेहमीच गंभीर आजारांशी संबंधित नसते. हे सामान्य रोगांच्या आधारावरच शरीराच्या वयाची माहिती मिळते. हे दर्शविते की मानवी शरीर कोणत्या मार्गाने जात आहे. ते किती दिवस निरोगी राहू शकते. जर एखाद्या व्यक्तीस कोणताही आजार नसेल आणि त्याची जीवनशैली योग्य असेल तर तो दीर्घ आयुष्याचा मालक होऊ शकतो.

जेव्हा वैज्ञानिकांनी निरोगी लोकांची तपासणी केली तेव्हा असे आढळले की त्यांचा DOSI भविष्यात होणाऱ्या संभाव्य रोगांबद्दल सांगू शकतो, परंतु सद्यस्थितीत कोणत्याही रोगाचा इशारा देत नाही. कारण त्यांची राहण्याची पद्धत योग्य आहे. मग शास्त्रज्ञांनी DOSI ची पातळी वाढवून पाहिली. जेणेकरून जास्तीत जास्त संभावित वय निश्चित केले जाऊ शकेल. कारण वाढत्या वयानुसार DOSI वाढत जाते.

DOSI आणि वृद्धापकाळातील संबंध सूचित करतात की जर शरीराचे सर्व भाग संतुलितपणे कार्य करत असतील. कोणताही गंभीर आजार नसेल. जगण्याची पद्धत योग्य असेल तर एखादी व्यक्ती 120 ते 150 वर्षे वयापर्यंत पोहोचू शकते. शास्त्रज्ञांनी असेही सांगितले की भविष्यात तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरीही वय वाढणे कमी करता येणे शक्य नाही.

वाढत्या वयानुसार, शरीराची शारीरिक क्षमता (बाह्य आणि अंतर्गत क्षमता) कमी होते. यावर रोगदेखील अधिक घातकपणे काम करतात. सध्याच्या काळात जीवनशैलीशी संबंधित आजार अधिक प्रमाणात होत आहेत. अशा परिस्थितीत माणसाचे सरासरी वय कमी होत आहे. आयुष्य वाढवण्यासाठी कोणतेही तंत्र किंवा थेरपी कार्य करणार नाही. त्यासाठी माणसाला अधिक चांगले जीवन जगण्याची पद्धत शिकावी लागेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

5 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

5 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

5 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago