लेबनॉनची राजधानी बैरुतला हादरवणारा प्रचंड स्फोट फटाके आणि अमोनियम नायट्रेटचा साठा पेटल्याने झाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या स्फोटात किमान १३५ लोक ठार, तर चार हजाराहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या स्फोटांनंतर सरकारनं दोन आठवड्यांच्या आणीबाणीची घोषणा केली आहे. तसंच यादरम्यान लष्करालाही अनेक अधिकार देण्यात आले आहे. तसंच या प्रकरणाचा तपास होईपर्यंत बैरुत बंदराच्या अधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
नागरी युद्ध, इस्रायलसोबतचे संघर्ष आणि दहशतवादी हल्ले सोसणाऱ्या या शहरातील हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्फोट होता. शहराच्या मध्य भागातील प्रमुख रस्त्यांवर दगडमाती आणि उद्ध्वस्त झालेली वाहने विखुरली होती. दरम्यान, स्फोटानंतरच्या काही सॅटलाईट इमेजेसही समोर आल्या आहेत. त्यामुळे या स्फोटाची भीषणता किती होती याचाही अंदाज येतो. या स्फोटाची व्याप्ती इतकी होती, की इमारतींच्या खिडक्या स्फोटाचे केंद्र असलेल्या बैरुतच्या बंदरापासून कित्येक किलोमीटर दूर जाऊन पडल्या.
बेरूत स्फोट: लेबनॉनच्या बंदर क्षेत्रात झालेल्या स्फोटात 25 जण ठार तर 2,500 हून अधिक जखमी
बंदरात साठवलेल्या फटाक्यांना लागलेल्या आगीमुळे हे घडून आले असावे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. एखाद्या स्फोटाची तीव्रता तज्ज्ञमंडळी स्फोटामुळे निर्माण झालेल्या खड्डय़ावरून निश्चित करतात. बुधवारी सकाळी विमानातून घेण्यात आलेल्या छायाचित्रात हे भगदाड प्रचंड असल्याचे दिसून आले. हा खड्डा आणि दूर उडालेल्या खिडक्यांचे अंतर, यावरून हा स्फोट किमान २.२ किलोटन टीएनटीच्या स्फोटाइतका असल्याचे शस्त्रविषयक तज्ज्ञ सिम टॅक म्हणाले.
२०१४ साली एका मालवाहतूक जहाजातून जप्त करण्यात आल्यानंतर बंदरावरील एका गोदामात साठवण्यात आलेल्या २७०० टनहून अधिक अमोनियम नायट्रेटमुळे हा स्फोट झाला असावा, असे लेबनॉनचे अंतर्गत मंत्री मोहम्मद फहमी यांनी सांगितले.
लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांनी भाषणात सर्व देशांना, तसेच लेबनॉनच्या मित्रांना या लहान देशाला मदत करण्याचे आवाहन केले. आमच्यावर खरोखरच विनाशकारी संकट ओढवले आहे, असे ते म्हणाले.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…