अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी सीबीआय (CBI) मुंबई पोलीस दलाच्या दोन डीसीपींची चौकशी करणार आहे. डीसीपी त्रिमुखे रिया चक्रवर्ती हिच्या सतत संपर्कात होते, या वृत्तातले तथ्य तपासणे आणि अन्य काही मुद्यांची माहिती घेण्यासाठी सीबीआय डीसीपी त्रिमुखेंची चौकशी करण्याची शक्यता आहे. तपासात सहभागी अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सुशांतचे मेव्हणे आणि वरिष्ठ आयपीएस ओ पी सिंह यांनी वांद्रे पोलीस उपायुक्त परमजीत सिंह दहिया यांना मेसेज करुन सुशांतच्या जीवाला धोका असल्याची शक्यता कळवली होती. हा मेसेज मिळाल्यावर उपायुक्तांनी Noted असा रिप्लाय पाठवला मात्र पुढे कोणतीही कारवाई केली नाही. मुंबई पोलिसांची या प्रकरणातही चौकशी होणार आहे.
बिहार पोलिसांनी सुशांतचे वडील के के सिंह यांची तक्रार दाखल करुन या प्रकरणात मुंबईत मर्यादीत तपास केला. या तपासानंतर बिहार पोलिसांनी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने बिहार पोलिसांची कृती वैध ठरवली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाआधारे सीबीआयने बिहार पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्याकडे असलेली सुशांत प्रकरणाची माहिती घेतली. सीबीआयचे पथक आता मुंबई पोलिसांकडून सुशांत प्रकरणातील त्यांच्या कारवाईची सविस्तर माहिती घेईल. सुशांतचा मृत्यू तसेच त्याच्याशी संलग्न असलेल्या सर्व प्रकरणांचा तपास करण्याचे अधिकार सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.
वांद्रे येथील ज्या घरात सुशांतचा मृत्यू झाला तिथे सीबीआय जाणार आहे. मुंबई पोलिसांच्या नोंदीआधारे सीबीआय सोबतचे फॉरेन्सिकचे पथक १४ जून २०२०च्या घटनेचा देखावा उभा करणार आहे. या प्रक्रियेद्वारे नेमके काय घडले हे समजून घेऊन पुराव्यांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…