मनोरंजन

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेते अरविंद धनू यांचे निधन

मुंबई : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या प्रसिद्ध मराठी टीव्ही शोमधील अभिनेते अरविंद धनू यांचे निधन झाले आहे. ते 47 वर्षांचे होते. अरविंद यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

वृत्तानुसार, अरविंद धनू सोमवारी मुंबईत एका कार्यक्रमात गेले होते. तेथे त्यांना अस्वस्थ वाटत असल्यामुळे तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले पण अरविंद यांची प्रकृती खालावत गेली. अखेर ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचा मृत्यू झाला.

अरविंद धनू यांनी आतापर्यंत अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते, परंतु त्यांना सर्वात जास्त लोकप्रियता टीव्ही शो ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मधून मिळाली. शोमध्ये त्यांनी राजकारणी आणि माधवी निमकरच्या ऑन-स्क्रीन वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांच्या व्यक्तिरेखा आणि अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिंकली. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. ते ‘झील मांझी लडकी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ आणि ‘क्राइम पेट्रोल’ या मालिकांमध्ये दिसले होते. यासोबतच त्यांनी ‘एक होता वाल्या’ या मराठी चित्रपटात काम केले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago