Reserve Bank of India
नवी दिल्ली : बँकिंग कर्ज घेण्याचं प्रमाण कमी झालं असून कोरोनाची दुसरी लाट त्याला आणखी खाली आणू शकते. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आरबीआयने प्रयत्न सुरु केले आहेत. त्याबाबत शुक्रवारी केंद्रीय बँकेच्या उच्चस्तरीय संघाने देशाच्या लघु वित्त बँकांशी (SFB) बैठक घेतली. यामध्ये सध्याच्या आव्हानात्मक काळात समाजातील विविध घटकांना कर्ज वितरण करण्याचा विचार केला गेला.
रिझर्व्ह बँक लवकरच अन्य बँकांशीही अशाच प्रकारच्या बैठका घेणार आहे. कारण या वर्षाच्या मार्च महिन्यात बँकिंग कर्जात अवघ्या पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा डेटा शुक्रवारीच आरबीआयने जाहीर केला आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, यावर्षी मार्च महिन्यात बँकिंग कर्ज वितरणामध्ये ४.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये ही टक्केवारी 6.8 इतकी होती. या महिन्यात अन्नधान्याचे क्रेडिट 24.4 टक्क्यांवरून 18.3 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत आणि सेवा क्षेत्रातील क्रेडिट 7.4 टक्क्यांवरून 1.4 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.
या महिन्यात वैयक्तिक कर्जाच्या वाढीचा दर 15 टक्क्यांवरून 14.2 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गृहकर्ज 15.4 टक्क्यांवरून घसरून 9.1 टक्क्यांवर आले आहे. तथापि, कृषी आणि संबंधित क्षेत्रांना दिलेली कर्जे 4.2 टक्क्यांवरून 12.3 टक्क्यांपर्यंत वाढली आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गेल्या वर्षी मार्चनंतरच्या महिन्यांत कर्ज वितरणाची गती खूप वेगाने खाली आली होती.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…