हिंगोली : शेतकरी देवानंद मुधोळ (वय 20) यांचा मागील आठवड्यात खुन झाला होता. आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. कळमनुरी तालुक्यातील गौळ बाजार येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या देवानंद यांच्या वडिलांनीच केल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना आज (२७ मे) दुपारी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील गौळ बाजार येथील संतोष मुधोळ यांचे गावापासून काही अंतरावर १२ एकर शेत आहे. संतोष मुधोळ यांचा मुलगा देवानंद हा शनिवारी (२१ मे) रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. मात्र, रविवारी सकाळी तो घरी परतला नाही. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता त्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरु केला, मात्र पोलिसांना हत्या करण्याचे कोणतेही कारण सापडत नव्हते. घटनास्थळी कुठल्याही प्रकारचा पुरावा मिळत नव्हता. त्यामुळे पोलिसांसमोर या खुनाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते.
मागील दोन वर्षापासून देवानंद हा शेती करत होता. तो होतकरू होता आणि वडिलांनी घेतलेले कर्जही त्याने फेडले होते. तसेच वडिलांना यापुढे कोणीही पैसे देऊ नये, असे त्याने सर्वांना सांगितलेले होते. काही दिवसांपूर्वीच संतोष मुधोळ याने बकरा विकला होता, त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. देवानंद रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. तसेच मृत देवानंद याचे कोणाशी शत्रुत्वही नव्हते. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी देवानंद यांचे वडील संतोष मुधोळ यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तेव्हा त्यानेच मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.
देवानंद याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची माहिती वडील संतोष मुधोळ यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर हत्या करण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यासाठी पोलिसांचे पथक गौळ बाजारकडे रवाना झाले. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शना खाली यातिष देशमुख, कळमनुरीचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे, सहायक निरीक्षक रोयलावार, उपनिरीक्षक सोनुळे, जमादार घ्यार, एस. पी. सांगळे यांच्या पथकाने तपास सुरू केला व खूनाचा उलगडा केला.
अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…