How the baby should be fed- according to the month
बाळाच्या आगमनानंतर घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. बाळाच्या आईला आनंद तर असतोच पण तिला चिंता असते कि, बाळाचे पोट पूर्णपणे भरतेय का ? नवजात बाळाला पहिले सहा महिने आईच्या दुधाशिवाय इतर कशाचीही आवश्यकता नसते. स्तनपानतून पूर्ण पोषक घटक बाळाला मिळत असतात. पण सहा महिन्यानंतर बाळाला काय आहार द्यायचा, याविषयी आज आपण जाणून घेऊ.
जर तुम्ही नुकतेच पालक झाला असाल तर विशिष्ट कालावधीत बाळाला काय खायला द्यायचे व किती? या आणि अजून अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आज आपल्याला बालरोग तज्ञ डॉ. शाम दुर्गुडे देणार आहेत.
बाळाचा आहार – नवजात बाळासाठी आईचे दूध सर्वोत्तम, बाळाच्या आईला जर दूध व्यवस्थित असेल तर पहिले सहा महिने बाळाला इतर कशाचीही आवश्यकता नसते. बाळाला आईचे दूध कमी पडत असेल तर डॉक्टरांच्या सल्यानुसार वरचे दूध किंवा पूरक आहार सुरु करता येतो परंतु बाळाला दूध कमी पडते आहे याचे निदान बाळाच्या आईने किंवा घरच्यांनी करण्यापेक्षा डॉक्टरांनी केलेले कधीही चांगले. आईचे दूध हा बाळाच्या पोषक आहारातील महत्त्वाचा घटक असतो. त्यापासून बाळाचे पोषण व संरक्षणही होते.
साधारणतः आहार खालील प्रमाणे चालू करता येईल
बाळाला दिवसातून किती वेळा खायला दयावे :
जन्मापासून ५ वर्षापर्यंत बाळाच्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर ठराविक कालांतराने बाळाचे वजन, उंची व शरीराची इतर मोजमापे नियमितपणे घेणे आवश्यक आहे. ह्यामुळे बाळाची वाढ योग्य प्रमाणात होत आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकते. वाढ योग्य होत नसल्यास त्या दृष्टीने तपासणी करून अयोग्य वाढीची कारणे शोधून काढता येतील. सदर कारणानुसार बालकावर उपचार करून पुढील गुंतागुंत निश्चितपणे टाळता येईल. ५ वर्षापर्यंत बालकाची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे.
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी :
डॉक्टर शाम दुर्गुडे
मातोश्री हॉस्पिटल, संगमनेर
7218636392
www.matoshreehospitals.in
Matoshrihospitals@gmail.com
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…