मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी पोलिस खात्यात “पैसे वसूली योजना” चालविल्याच्या आरोपाखाली राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरूद्ध सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुप्रीम कोर्ट 26 मार्च रोजी सुनावणी घेण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य सरकारमधील अन्य काही ज्येष्ठ नेते यांना 17 मार्च रोजी […]
टॅग: Home Minister Anil Deshmukh
15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी केला फ्लाईट मध्ये प्रवास? देशमुख यांनी दिलं स्पष्टीकरण
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख सर्वांच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात बराच काळ रुग्णालयात होते. त्यानंतर 15 फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी चार्टर्ड फ्लाईट मध्ये प्रवास केल्याची माहिती समोर आली. त्यावर आता अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण […]
राज्यात ‘या’ प्रकरणाचा निष्पक्ष तपास होईल याची मला अजिबात खात्री नाही – राज ठाकरे
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर भाजपाकडून देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता अंबानी यांच्या घराजवळ कुणाच्या सांगण्यावरून स्फोटकं ठेवण्यात आली हे समोर यायचं असेल, तर केंद्र सरकारने याची चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी […]
परमबीर सिंह यांच्या आरोपांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया
मुंबई : परमबीर सिंह यांच्या आरोपांवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंह यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटलं कि, “मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस […]
गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी रुपये वसुल करण्यास सांगितलं – परमबीर सिंग
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील महत्वाचे मुद्दे : मार्चच्या मध्यावर वर्षा बंगल्यावर मी […]
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली
मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. परमबीर सिंग यांची गृहरक्षक दलामध्ये बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन वाझे प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांच्यावर टीका केली जात होती. अखेर आज राज्य सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश दिले […]
जळगावमधील महिला वसतिगृहात अनुचित प्रकार घडलाच नाही, ‘ते’ आरोप तथ्यहीन – गृहमंत्री
जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याच्या मुद्द्यावरून काळ विधानसभेत बराच वादविवाद झाला. त्यानंतर आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी निवेदन सादर करत सहा महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला. अनिल देशमुख यांनी यावेळी पोलिसांवर लावण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचं सांगत असं काही घडलंच नसल्याची माहिती दिली. […]
जळगावच्या महिला वसतीगृहात झालेल्या ‘त्या’ संतापजनक प्रकारावरून विधानसभेत चर्चा, जाणून घ्या प्रकरण..
जळगावच्या महिला वसतीगृहात पोलिसांनी महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याची धक्कादायक घटना घडली होती. या संतापजनक प्रकारची दखल आज विधीमंडळात घेण्यात आली. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. तरुणींना कपडे काढून डान्स करायला लावून त्याचा व्हिडीओ बनवला गेला. या गंभीर प्रकाराबद्दल दोषींवर कारवाई झाली पाहिजे. गृहमंत्र्यांना विनंती आहे की संबंधित पोलिसांचं […]
शरजील उस्मानीवर होणार कारवाई, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती
मुंबई : शरजील उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर असून आम्ही त्याला शोधून अटक करु, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे. पुण्यात 30 जानेवारीला झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने वादग्रस्त वक्तव्य करत चिथावणीखोर भाषा वापरली होती. तो म्हणाला होता की, “आजचा हिंदू समाज हा पूर्णपणे सडला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी एका वर्षात 19 लोकांची हत्या […]
पोलीस भरती प्रक्रिया सुरु, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली माहिती
राज्यातील रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी पोलीस भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा नसल्याचे स्पष्ट केले. मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती प्रक्रियेला थोडा विलंब झाला. मात्र, आम्ही मराठा नेत्यांशी बोललो आहोत. राज्यात […]









