ठाणे : घराशेजारी थुंकल्याच्या कारणावरून 13 वर्षांच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी या मुलाच्या एका नातेवाइकाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 25 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. रूपेश विजय गोळे (वय 13) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिव्यातील नागवाडीमध्ये हा मुलगा राहतो आणि या मुलाच्या घराशेजारीच त्याचा नातेवाइक आरोपी दशरथ काकडे (28) राहतो. 17 एप्रिलला दुपारी काकडे रूपेशला घेऊन बाहेर गेला होता. मात्र, बराच वेळ होऊनही रूपेश घरी परतला नाही. त्यानंतर रूपेशच्या मोठ्या भावाने दशरथला फोन करून रूपेशविषयी विचारले. त्याने सांगितले की रूपेशला 50 रुपये देऊन जत्रेमध्ये सोडले आहे. तरीही रूपेश घरी आलाच नाही, त्यामुळे दुसऱ्या दिवशी पहाटे मुंब्रा पोलिस ठाण्यात रुपेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी तपास सुरु केला आणि याबाबत दशरथकडे चौकशी केली. त्याने सांगितले की माझ्या मामाचा मुलगा रुपेशच्या वयाचा असल्यामुळे त्याला मापासाठी घेऊन कपडे आणायला गेलो होतो. त्यानंतर पोलिसांनी नेमके कपडे खरेदीसाठी कोठे गेले होते, याबाबत दशरथकडे चौकशी केली. त्याने रस्त्यावरील विक्रेत्याकडे कपडे घेण्यासाठी गेल्याचे सांगितले. परंतु, पोलिसांनी त्या विक्रेत्याकडे चौकशी केल्यानंतर कपडे खरेदीसाठी कोणी आले नसल्याचे विक्रेत्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी दशरथकडे कठोरपणे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
17 एप्रिलला दुपारी दशरथ रूपेशला घेऊन दिव्यातील बंद असलेल्या एका शौचालयाच्या पहिल्या मजल्यावर गेला. नंतर त्याने रूपेशची गळा दाबून हत्या केली. दशरथच्या घराशेजारी रूपेश थुंकत असल्याच्या रागातून या दोघांमध्ये वादही झाले होते. याच रागातून आरोपीने रूपेशची हत्या केली.
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…